शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

काश! त्यारात्री मनिषला घरी घेऊन गेले असते वडील; JEE पेक्षाही खूपकाही आहे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 12:44 IST

यूपी-बिहारहून बरेच विद्यार्थी भविष्याचे स्वप्न पाहत कोटा इथं शिक्षणासाठी येतात.

कोटा – १७ वर्षीय मनिष प्रजापत जो IIT-JEE परीक्षेची तयारी करत होता त्यानं हॉस्टेलमध्ये पंख्याला लटकून गळफास घेतला. मनिष इंजिनिअरींगच्या तयारीसाठी आजमगडहून कोटाला आला होता. ज्यादिवशी त्याने हे टोकाचे पाऊल उचललं त्याच्या काही क्षणापूर्वी त्याचे वडील कोटामध्ये त्याच्यासोबत होते. जसं वडिलांनी कोटाहून घरी जाण्यासाठी ट्रेन पकडली तसं मनिषनेही या जगाचा निरोप घेतला.

यूपी-बिहारहून बरेच विद्यार्थी भविष्याचे स्वप्न पाहत कोटा इथं शिक्षणासाठी येतात. आई वडीलही मुलांच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू देत नाहीत. मग कोटा येथे आल्यानंतर मुलांच्या मनाची घालमेल का होतेय? अलीकडेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाने सुसाईड केल्याची घटना घडली. यूपीच्या मनजोत सिंहने कोटा येथे आत्महत्या करून जीव दिला.

सॉरी..हॅप्पी बर्थडे पापा

मनजोतने भिंतीवर तीन नोट्स चिकटवल्या होत्या,  Sorry, मी जे काही केले माझ्या मर्जीने केले आहे. प्लीज माझ्या मित्रांना आणि पालकांना त्रास देऊ नका. यानंतर पुढच्या चिठ्ठीत हॅप्पी बर्थडे पापा असे लिहून त्याने हार्ट इमोजी काढला. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.

कोटा येथे राहणाऱ्या किर्ती नामानं सांगितले की, मी राजस्थान बोर्डातून शिक्षण घेतले आहे. ८५ टक्के गुण मिळवल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचीही तयारी सुरू केली. बोलता बोलता तिने तिथे मुले आत्महत्या का करतात याचे खरे कारण सांगितले. तुम्ही पालक असाल किंवा तुम्हाला स्वतः कोटा किंवा इतर कोणत्याही शहरात अभ्यासासाठी जायचे असेल. किंवा घरीच अभ्यास करत असताना यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे असं तिने सांगितल.

मुलं स्वत:ला हुशार मसूजन कोट्यात येतात, पण कधी इंग्रजी-हिंदी माध्यमाचा अभाव, कधी स्पष्टवक्तेपणा, कधी तडफदारपणा, काही मुलं स्वत: दडपणाखाली जातात. कोटामध्ये एक, दोन किंवा १०-२० नव्हे तर अनेक संस्था आहेत. येथे विद्यार्थ्यांचा मेळा भरवला जातो. वर्ग गर्दीने फुलले जातात. अशा परिस्थितीत स्वत:वरील विश्वास कमी पडतो. शिक्षकही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मुलांच्या समस्या वाढतात असंही किर्ती म्हटलं.