शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

"देशाचा महासत्तेकडे प्रवास, तर राजस्थानचा गुन्हेगारीकडे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 10:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; कॉंग्रेसचे राजकारण तुष्टीकरणाचे

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येते, त्या राज्यांमध्ये भ्रष्टाचारी, गुन्हेगार, दंगलखोरांना मुक्त वातावरण मिळते. काँग्रेसमुळेच राजस्थान हे देशात भ्रष्टाचार, दंगली, गुन्हेगारीमध्ये अग्रेसर राज्य ठरले आहे. तुष्टीकरणासाठीच ते काम करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भरतपूर येथील भाजपच्या ‘विजय संकल्प सभेला’ ते संबोधित करत होते. 

एकीकडे भारत देश जागतिक महासत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे, तर दुसरीकडे राजस्थानात गेल्या पाच वर्षांमध्ये काय झाले?  या काळात राजस्थानचे जे नुकसान झाले, त्यास कोण जबाबदार आहे?  मागील पाच वर्षांमध्ये होळी असो, रामनवमी असो वा हनुमान जयंती, कोणताही सण येथील नागरिक शांततेत साजरे करू शकले नाही. सणासुदीच्या काळात राज्यात दंगली, दगडफेक, संचारबंदी लावण्यात आली, असे मोदी म्हणाले.

दिलेली आश्वासने पूर्ण करणारचराजस्थानला प्रगतिपथावर नेण्याचा संकल्प भाजपने केला आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्याची हमी मी देतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आश्वासित केले.

जादूगर होईल छू-मंतरकाही लोक स्वतःला जादूगर समजतात. परंतु निकालावेळी लोकच म्हणतील, ‘३ डिसेंबर, काँग्रेस छू-मंतर. अशी टीका मोदींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली.

राजस्थानात पेट्रोल महाग का? राजस्थानचे शेजारी राज्य असलेल्या हरयाणा, मध्य प्रदेश तसेच गुजरातमध्ये पेट्रोल ९७ रुपये लिटर मिळते, मग राजस्थानमध्ये ते १०९ रुपयांना कसे काय मिळते? येथील काँग्रेस सरकार लिटरमागे तुमच्या खिशातून १२ रुपये काढते. भाजपची सत्ता आल्यास काँग्रेसचा हा खेळ बंद होईल, असेही मोदी म्हणाले.

‘तुम्ही कितीही प्रयत्न करा; सत्तेवर काँग्रेसच येईल’ जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच सरकार स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरिबांना अधिक गरीब करण्याचे काम भाजप करत असल्याची टीकाही त्यांनी केली. भरतपूर जिल्ह्यातील वैर येथील सभेला ते संबोधित करत होते.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी काम केले, तर भाजपचे नेते म्हणतात की ही रेवडी योजना आहे. आम्ही तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, पण तुम्ही तर श्रीमंतांचे १५ कोटींचे कर्ज माफ करण्याचे काम केले. अग्निवीर योजनेतून केंद्र सरकार देशभरातील युवकांची फवसणूक करत असल्याचेही खरगे यांनी नमूद केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक