शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

"देशाचा महासत्तेकडे प्रवास, तर राजस्थानचा गुन्हेगारीकडे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 10:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; कॉंग्रेसचे राजकारण तुष्टीकरणाचे

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येते, त्या राज्यांमध्ये भ्रष्टाचारी, गुन्हेगार, दंगलखोरांना मुक्त वातावरण मिळते. काँग्रेसमुळेच राजस्थान हे देशात भ्रष्टाचार, दंगली, गुन्हेगारीमध्ये अग्रेसर राज्य ठरले आहे. तुष्टीकरणासाठीच ते काम करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भरतपूर येथील भाजपच्या ‘विजय संकल्प सभेला’ ते संबोधित करत होते. 

एकीकडे भारत देश जागतिक महासत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे, तर दुसरीकडे राजस्थानात गेल्या पाच वर्षांमध्ये काय झाले?  या काळात राजस्थानचे जे नुकसान झाले, त्यास कोण जबाबदार आहे?  मागील पाच वर्षांमध्ये होळी असो, रामनवमी असो वा हनुमान जयंती, कोणताही सण येथील नागरिक शांततेत साजरे करू शकले नाही. सणासुदीच्या काळात राज्यात दंगली, दगडफेक, संचारबंदी लावण्यात आली, असे मोदी म्हणाले.

दिलेली आश्वासने पूर्ण करणारचराजस्थानला प्रगतिपथावर नेण्याचा संकल्प भाजपने केला आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्याची हमी मी देतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आश्वासित केले.

जादूगर होईल छू-मंतरकाही लोक स्वतःला जादूगर समजतात. परंतु निकालावेळी लोकच म्हणतील, ‘३ डिसेंबर, काँग्रेस छू-मंतर. अशी टीका मोदींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली.

राजस्थानात पेट्रोल महाग का? राजस्थानचे शेजारी राज्य असलेल्या हरयाणा, मध्य प्रदेश तसेच गुजरातमध्ये पेट्रोल ९७ रुपये लिटर मिळते, मग राजस्थानमध्ये ते १०९ रुपयांना कसे काय मिळते? येथील काँग्रेस सरकार लिटरमागे तुमच्या खिशातून १२ रुपये काढते. भाजपची सत्ता आल्यास काँग्रेसचा हा खेळ बंद होईल, असेही मोदी म्हणाले.

‘तुम्ही कितीही प्रयत्न करा; सत्तेवर काँग्रेसच येईल’ जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच सरकार स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरिबांना अधिक गरीब करण्याचे काम भाजप करत असल्याची टीकाही त्यांनी केली. भरतपूर जिल्ह्यातील वैर येथील सभेला ते संबोधित करत होते.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी काम केले, तर भाजपचे नेते म्हणतात की ही रेवडी योजना आहे. आम्ही तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, पण तुम्ही तर श्रीमंतांचे १५ कोटींचे कर्ज माफ करण्याचे काम केले. अग्निवीर योजनेतून केंद्र सरकार देशभरातील युवकांची फवसणूक करत असल्याचेही खरगे यांनी नमूद केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक