शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना - गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 08:15 IST

राजस्थानातील सभेत राहुल गांधी यांचा शब्द

बुंदी/दौसा : देशात जातनिहाय जनगणना न केल्याबद्दल केंद्रातील सरकारवर टीका करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे सभेत लोकांना शब्द दिला की, केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल. बुंदी येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गरीब, शेतकरी आणि मजूर ही भारत माता आहे. जातनिहाय जनगणनेबद्दल ते म्हणाले की, केंद्रातील सरकार जातनिहाय जनगणना करू शकत नाही. हे काम काँग्रेसच करू शकते.

राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास गेहलोत सरकारने सुरू केलेल्या सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्या जातील. राहुल गांधी म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेदरम्यान आपण हजारो तरुणांशी संवाद साधला. या तरुणांनी त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे असल्याचे सांगितले. ९० आयएएस अधिकाऱ्यांसह देश चालविला जात असून, त्यापैकी केवळ तीनच ओबीसी अधिकारी असल्याचा दावा राहुल यांनी केला. त्यामुळे जात जनगणना ही देशाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे  आणि आम्ही ती करू, असे राहुल म्हणाले.

शेतकरी, मजुरांचे सरकार बनवा

आदिवासींबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस त्यांना आदिवासी म्हणते; पण केंद्र सरकारमधील सत्ताधारी त्यांना वनवासी म्हणतात.

राजस्थानमध्ये गरीब, शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी यांचे सरकार बनवा. मी तुम्हाला हमी देतो की, केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय गणना केली जाईल.

इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना राहुल गांधी म्हणाले की, राजस्थान सरकारने राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. जेणेकरून गरीब, शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना त्यात शिक्षण घेता येईल. गरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावे, असे भाजपला वाटत नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajasthanराजस्थानElectionनिवडणूक