शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

राजस्थानमध्ये ईडीची मोठी कारवाई! आयएएस अधिकाऱ्यांसह २५ ठिकाणी छापा; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 10:44 IST

ईडीने आज सकाळीच राजस्थानमधील काही ठिकाणी छापे टाकले आहेत.

ईडीने आज सकाळी राजस्थानमध्ये मोठी कारवाई केली आहे, ईडीने राजस्थानमधील २५ ठिकाणी छापे टाकले आहेत. राजस्थानमध्ये छापे टाकण्यात आलेले छापे एका IAS अधिकाऱ्याच्या ठिकाणांसह एकूण २५ ठिकाणी टाकले जात आहेत. जलजीवन मिशन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची ही कारवाई करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये गेल्या काही आठवड्यात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. राजधानी जयपूरपासून अनेक मोठ्या शहरांमध्ये ईडीची कारवाई करण्यात आली आहे.

Kangana Ranaut : "भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर लोकसभा निवडणूक लढवेन"; कंगनाचे राजकारणात येण्याचे संकेत

राजस्थानमधील अँटी करप्शन ब्युरोने परमचंद जैन यांच्यासह खासगी कंत्राटदारांवर कराराशी संबंधित अनियमितता लपविण्यासाठी बेकायदेशीर सुरक्षा, निविदा, बिले मंजूर करणे आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. या सर्वांनी सार्वजनिक आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांना लाच दिली. यानंतर ईडीने जल जीवन मिशनशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला.

भाजपचे राज्यसभा खासदार किरोरी लाल मीणा यांनी जूनमध्ये राजस्थानमध्ये जल जीवन मिशन राबविण्याच्या नावाखाली २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मिशनच्या ४८ प्रकल्पांमध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे दोन कंपन्यांना ९०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

किरोनी लाल मीना म्हणाले होते की, 'केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत २००० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हे सर्व पीएचईडी मंत्री आणि विभागाचे सचिव यांच्या माध्यमातून संयुक्तपणे करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्‍या जल जीवन मिशनचा उद्देश घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी पुरविणे हा आहे.

या अगोदर सप्टेंबर महिन्यात ईडीने छापा टाकला होता. जयपूरमध्ये जल जीवन मिशन संदर्भात अनेक बँक लॉकरांचा तपास केला आहे. यात ५.८६ कोटी रुपयांचे सोनं आणि चांदी जप्त केलं. ईडीला एकुण ९.६ किलो सोनं आणि ६.३ किलो चांदी सापडली आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय