शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यंदा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 23:47 IST

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

- जयंत धुळप अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात, ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर नागली, ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्य, १४०० हेक्टरवर तूर, १०४० हेक्टरवर इतर कडधान्य असे नियोजन आहे.खरीप हंगामातील उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवाव्यात, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी दिले. जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी संगणकीय सादरीकरण केले. बैठकीस रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे उपस्थित होते.>जिल्ह्यात १७ भरारी पथकांची स्थापनापेरणीनंतर उत्पादन वाढीसाठी २४ हजार ८६० मे.टन रासायनिक खतांची मागणी (आवंटन) मंजूर करण्यात आली असून खतेही उपलब्ध आहेत. पिकांवरील संभाव्य रोगराई निवारणासाठी ६ हजार १९७ लीटर कीटकनाशके व बुरशीनाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे. बियाणे व अन्य कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दोन तर प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे एकूण १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहेत.>भातपिकासाठी ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूरकृषी आयुक्तालयाने भात पिकाकरिता ४९ हजार रुपये प्रति हेक्टरी पीककर्ज दर ठरविला आहे. संकरित व बासमती भाताकरिता ५५ हजार १०० रु पये प्रति हेक्टर दर निश्चित केले आहेत. तर रायगड जिल्हास्तरीय समितीने सर्वप्रकारच्या भाताकरिता ५५ हजार रु पये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूर करण्यात आला आहे.>उत्पादन वाढीसाठी शेतीशाळाभातपिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन (क्रॉप सॅप) अंतर्गत शेतीशाळा भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोहिणी नक्षत्र पंधरवडा ते मृग नक्षत्र या कालावधीत या शेतीशाळा जिल्हाभरात २७६ कृषी सहायकांच्या माध्यमातून, कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन अंतर्गत निवड केलेल्या गावांमध्ये भरविल्या जाणार आहेत.