शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

यंदा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 23:47 IST

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

- जयंत धुळप अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात, ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर नागली, ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्य, १४०० हेक्टरवर तूर, १०४० हेक्टरवर इतर कडधान्य असे नियोजन आहे.खरीप हंगामातील उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवाव्यात, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी दिले. जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी संगणकीय सादरीकरण केले. बैठकीस रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे उपस्थित होते.>जिल्ह्यात १७ भरारी पथकांची स्थापनापेरणीनंतर उत्पादन वाढीसाठी २४ हजार ८६० मे.टन रासायनिक खतांची मागणी (आवंटन) मंजूर करण्यात आली असून खतेही उपलब्ध आहेत. पिकांवरील संभाव्य रोगराई निवारणासाठी ६ हजार १९७ लीटर कीटकनाशके व बुरशीनाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे. बियाणे व अन्य कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दोन तर प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे एकूण १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहेत.>भातपिकासाठी ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूरकृषी आयुक्तालयाने भात पिकाकरिता ४९ हजार रुपये प्रति हेक्टरी पीककर्ज दर ठरविला आहे. संकरित व बासमती भाताकरिता ५५ हजार १०० रु पये प्रति हेक्टर दर निश्चित केले आहेत. तर रायगड जिल्हास्तरीय समितीने सर्वप्रकारच्या भाताकरिता ५५ हजार रु पये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूर करण्यात आला आहे.>उत्पादन वाढीसाठी शेतीशाळाभातपिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन (क्रॉप सॅप) अंतर्गत शेतीशाळा भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोहिणी नक्षत्र पंधरवडा ते मृग नक्षत्र या कालावधीत या शेतीशाळा जिल्हाभरात २७६ कृषी सहायकांच्या माध्यमातून, कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन अंतर्गत निवड केलेल्या गावांमध्ये भरविल्या जाणार आहेत.