शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

कर्जतमधील दहा गावांत जलयुक्त शिवारमधून कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:17 AM

पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात अपयश; अभियानांतर्गत रोजगार मिळण्याची संधी

कर्जत : तालुक्यातील आठ गावांत जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला आहे.गतवर्षी आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर कर्जत तालुक्यात खर्च करू नये, अशी सूचना केली होती. तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी जलयुक्त शिवार बिनकामाचे ठरत असून केवळ शेतदुरुस्ती, बांधबंदिस्ती आणि गाळ काढण्याची कामे केली जातआहेत.२०१९ या वर्षात कर्जत तालुक्यातील ज्या दहा गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले, तेथे अभियानांतर्गत जुनी शेतदुरुस्ती, नवीन शेत तयार करणे आणि तलावातील गाळ काढणे याशिवाय कोणत्याही प्रकारची कामे समाविष्ट केली गेली नाहीत. यंदा बळीवारे, नांदगाव, खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, जुम्मापट्टी, चाफेवाडी, माणगाव या नऊ गावांत केवळ दुरुस्तीची कामे केली गेली आहेत. जुनी शेतदुरुस्ती करून अभियानातून अनेकांना रोजगार मिळावा, असे निर्देश आहेत; परंतु बहुतेक ठिकाणी ट्रॅक्टर ऐवजी जेसीबी मशिन लावून नवीन शेते तयार केली आहेत. भडवळ येथील एकमेव सिमेंट बंधारा अभियानात समाविष्ट आहे.खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, बळीवारे, नांदगाव अशा तालुक्यांच्या टोकावर असलेल्या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविताना सर्रास जेसीबी मशिन लावून शेतदुरुस्ती आणि नवीन शेत पाडण्याचे काम केले गेले आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविताना जमिनीची भूजल क्षमता वाढवून जुन्या पाणवठ्यांना पाण्याचे स्रोत निर्माण करणे आणि तेथे उभ्या असलेल्या झाडांना पाणी मिळावे म्हणून पाणी अडविण्याचे काम केले जाऊ शकते.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार