शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘रायगड’ परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काम, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:47 IST

किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे.

दासगाव : किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे. या गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या परिसरात नियोजनबद्ध काम करताना शासकीय अधिकारीआणि स्थानिक रहिवाशांची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.किल्ले रायगड परिसरातील २१ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता पाचाड येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, खा. युवराज संभाजीराजे, खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, माजी आ. माणिकराव जगताप  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी खासदार युवराज संभाजीराजे यांनी गडावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांची माहिती देत परिसरातील २१ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या गावातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापर करत शिवकालीन जलस्रोत पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.यावेळी शिवकाळातील नैसर्गिक स्रोत आणि त्यांना शासकीय योजनांचा आधार देत परिसरातील पाणी समस्या सोडवता येईल, असे स्पष्ट केले, तर किल्ले रायगड परिसरात असलेली गावे ही विविध वाड्यांमध्ये विखुरली आहेत. यामुळे विविध योजना राबवताना अडचणी येतात. मात्र, नाम फाउंडेशनच्या कामात आपला सहभाग असेल, असे सांगितले. 

शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत यावेळी मकरंद अनासपुरे यांनीदेखील शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत शोधून तो पुनरुज्जीवित करणे हे नामचे काम असून, पाण्याबरोबर या परिसरात प्रत्येक पर्यटकाने आणि शिवभक्ताने एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे, असे आवाहनदेखील केले. नाना पाटेकर यांनी कोणतेही काम करताना जात, धर्म आणि पक्ष सोडून काम केले पाहिजे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काम करण्याचे भाग्य लाभल्याने सुरुवातीस दोन गावांतील पाणी प्रश्न तडीस नेऊ, असे सांगितले. किल्ले रायगड परिसरात काल जलविद्युत प्रकल्प भूमिपूजन आपण केले असून, अद्याप तो पूर्ण झाला नसल्याने परिसरातील पाणी प्रश्न कायम असल्याचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरRaigadरायगड