शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

‘रायगड’ परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काम, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:47 IST

किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे.

दासगाव : किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे. या गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या परिसरात नियोजनबद्ध काम करताना शासकीय अधिकारीआणि स्थानिक रहिवाशांची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.किल्ले रायगड परिसरातील २१ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता पाचाड येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, खा. युवराज संभाजीराजे, खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, माजी आ. माणिकराव जगताप  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी खासदार युवराज संभाजीराजे यांनी गडावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांची माहिती देत परिसरातील २१ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या गावातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापर करत शिवकालीन जलस्रोत पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.यावेळी शिवकाळातील नैसर्गिक स्रोत आणि त्यांना शासकीय योजनांचा आधार देत परिसरातील पाणी समस्या सोडवता येईल, असे स्पष्ट केले, तर किल्ले रायगड परिसरात असलेली गावे ही विविध वाड्यांमध्ये विखुरली आहेत. यामुळे विविध योजना राबवताना अडचणी येतात. मात्र, नाम फाउंडेशनच्या कामात आपला सहभाग असेल, असे सांगितले. 

शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत यावेळी मकरंद अनासपुरे यांनीदेखील शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत शोधून तो पुनरुज्जीवित करणे हे नामचे काम असून, पाण्याबरोबर या परिसरात प्रत्येक पर्यटकाने आणि शिवभक्ताने एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे, असे आवाहनदेखील केले. नाना पाटेकर यांनी कोणतेही काम करताना जात, धर्म आणि पक्ष सोडून काम केले पाहिजे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काम करण्याचे भाग्य लाभल्याने सुरुवातीस दोन गावांतील पाणी प्रश्न तडीस नेऊ, असे सांगितले. किल्ले रायगड परिसरात काल जलविद्युत प्रकल्प भूमिपूजन आपण केले असून, अद्याप तो पूर्ण झाला नसल्याने परिसरातील पाणी प्रश्न कायम असल्याचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरRaigadरायगड