शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
4
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
5
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
6
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
8
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
9
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
10
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
11
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
12
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
13
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
14
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
15
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
16
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
17
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
18
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
19
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
20
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
Daily Top 2Weekly Top 5

‘रायगड’ परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काम, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:47 IST

किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे.

दासगाव : किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे. या गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या परिसरात नियोजनबद्ध काम करताना शासकीय अधिकारीआणि स्थानिक रहिवाशांची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.किल्ले रायगड परिसरातील २१ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता पाचाड येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, खा. युवराज संभाजीराजे, खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, माजी आ. माणिकराव जगताप  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी खासदार युवराज संभाजीराजे यांनी गडावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांची माहिती देत परिसरातील २१ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या गावातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापर करत शिवकालीन जलस्रोत पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.यावेळी शिवकाळातील नैसर्गिक स्रोत आणि त्यांना शासकीय योजनांचा आधार देत परिसरातील पाणी समस्या सोडवता येईल, असे स्पष्ट केले, तर किल्ले रायगड परिसरात असलेली गावे ही विविध वाड्यांमध्ये विखुरली आहेत. यामुळे विविध योजना राबवताना अडचणी येतात. मात्र, नाम फाउंडेशनच्या कामात आपला सहभाग असेल, असे सांगितले. 

शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत यावेळी मकरंद अनासपुरे यांनीदेखील शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत शोधून तो पुनरुज्जीवित करणे हे नामचे काम असून, पाण्याबरोबर या परिसरात प्रत्येक पर्यटकाने आणि शिवभक्ताने एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे, असे आवाहनदेखील केले. नाना पाटेकर यांनी कोणतेही काम करताना जात, धर्म आणि पक्ष सोडून काम केले पाहिजे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काम करण्याचे भाग्य लाभल्याने सुरुवातीस दोन गावांतील पाणी प्रश्न तडीस नेऊ, असे सांगितले. किल्ले रायगड परिसरात काल जलविद्युत प्रकल्प भूमिपूजन आपण केले असून, अद्याप तो पूर्ण झाला नसल्याने परिसरातील पाणी प्रश्न कायम असल्याचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरRaigadरायगड