शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम संथगतीने; प्रवासी त्रस्त, गेले काही महिने काम ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:34 IST

महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

दासगाव : महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. या भागातून ये -जा करत असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत. (Work on Mahad-Mhapral-Pandharpur road is slow; Travelers suffer, work stalled for the last few months) म्हाप्रळ-पंढरपूर हा राज्यमार्ग १५ महाडजवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठीपासून सुरुवात होऊन तालुक्यातील शिरगाव, पुढे खरवली, माझेरी करत पुणे जिल्हा हद्दीत प्रवेश होतो. महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती मात्र आता हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असून, हा मार्ग ९६५ डी. डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे. महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले. त्यातच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याच ठेकेदाराने किल्ले रायगड मार्गाचेदेखील काम घेतले होते. हे काम अर्धवट ठेवल्याने या ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे कामदेखील सदर ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. या प्रक्रियेमुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प आहे. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोऱ्यांची कामे, प्रवाशांना वाहन चालवताना धोकादायक ठरत आहेत.तालुक्यातील शिरगावपासून पुढे सव गावापर्यंत रस्ता काही अंशी बरा आहे मात्र स‌व गावांपासून पुढे कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न वाहनचालकापुढे पडत आहे. रत्नागीरी जिल्हयाला हा रस्ता जोडला गेला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सीमेवरील गावांचा अधिक संबंध महाडला असल्या कारणाने बाजारपेठ आणि शिक्षण आदी कारणास्तव या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, आणि मुंबईकडे जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्यादेखील या परिसरातून ये-जा करत असतात.  या मार्गावर महाड तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, म्हाप्रळ आदी गावे येतात. या परिसरातील नागरिकांचा थेट संबंध हा महाड शहराशी येत असल्याने प्रतिदिन वाहनांची ये-जा मोठी असते. त्यात या विभागात वामणे, हे कोकण रेल्वेचे स्थानकदेखील आहे. रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड