शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

निधीअभावी रखडली कालव्याची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:25 IST

हेटवणे सिंचनासाठी भरीव निधी अपेक्षित; महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाबाबत शेतकरी आशावादी

- दत्ता म्हात्रेपेण : राज्यात सत्तेवर आलेल्या काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारकडून विधिमंडळात सादर होणार असलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांना मोठ्या अपेक्षा आहेत. पेणमधील हेटवणे धरणाचे सिंचनाचे आरक्षित ८० दशलक्ष घनमीटर पाणी शेतीला मिळावे, निधीअभावी रखडलेली कालव्याची कामे मार्गी लागून येथील ६६६८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यावे, शेतीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून शेती आणि बेरोजगारीला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, हेटवणे धरणात शेती सिंचनाचे पाणी गेली पंधरा वर्षे पडून आहे, हे पाणी शेतीसाठी मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.हवामान बदलामुळे पावसावर पीकणारी जिरायती शेती बेभरवशाची झाली आहे. पेणमधील हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या ओलिताखाली ५२ महसुली गावांमधील तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावरील शेतीला सिंचनाचे पाणी मिळाल्यास व पेणचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, मात्र निधीअभावी कालव्याची कामे रखडली असून आता आलेल्या महाविकास आघाडीचे सरकारने हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या सिंचनाचा नियोजन आराखडा मंजूर करून निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.पेणमध्ये हेटवणे मध्यम प्रकल्पात सिंचनाचे ८० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. निधीअभावी कालव्याची कामे रखडली आहेत. येथील ५२ गावांतील खातेदार शेतकऱ्यांचा सातबारा उतारा व महसूल नोंदही झाली आहे.२००५ या वर्षात पेण मध्ये मुंबई एसईझेड प्रकल्प आला होता. त्या वेळी शेतकºयांनी मोठे जनआंदोलन उभे करून या शेतजमिनी हेटवणे प्रकल्प सिंचनाच्या लाभक्षेत्रातील असल्याने विकासकाला माघार घ्यावी लागली होती. आता दीड दशकभरात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. शेतकरी व त्यांच्या जमिनी जागच्या जागी आहेत. उणीव आहे ती ओलिताखालील जे क्षेत्र महसुली नोंदीत समावेश केला आहे, त्या क्षेत्राला सिंचनाचे पाणी मिळावे. हेटवणे धरण ते शहापाडा धरणाजवळ काश्मिरे गावाच्या वेशीवर कालवा येऊन ठेपला आहे. या कालवा परिसरातील १९ किलोमीटर क्षेत्रातील १७०० एकर भातशेतीला सिंचनाचे पाणी रब्बी हंगामासाठी मिळत असल्याने येथील शेतकरी सधन झाला आहे. कालवा विभागातील उर्वरित उजव्या व डाव्या कालव्याची कामे करण्यासाठी मोठमोठे सिमेंटचे पाइप २००८ पासून जागोजागी ठेवण्यात आले आहेत. या जागेचे भाडेसुद्धा संबंधित शेतकºयांना जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात येते. पाण्याची वितरण प्रणाली जमिनीखालील नलिका वितरण प्रणाली असल्याने शेतकरी व जलसंपदा विभाग यांच्या सहमतीने हे काम सुलभतेने करता येईल. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून सिंचनाचे पाणी व रखडलेली कालव्याची कामे यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकºयांकडून मागणी जोर धरत आहे.शेतीसाठी तरतूद हवीनवे सरकार शेतकºयांसाठी सर्वार्थाने काम करणारे आहे. हा विश्वास शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाल्याने हेटवणे सिंचनाचे पाणी शेतीसाठी मिळाल्यास पेण तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. जिरायती शेती सिंचनामुळे बागायती होऊन वर्षाकाठी शेतकºयांना शेतीविषयक व शेतीपूरक उद्योग-धंदे करण्यासाठी चालना मिळेल, अशी अपेक्षा पेणमधील शेतकरी वर्गाकडून महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पातून केली जात आहे.