शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महिलांची पायपीट थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:30 IST

तालुक्यातील बीड गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. रायगड जिल्हा परिषदेने उल्हास नदीवर विहीर खोदली असून या विहिरीतील पाणी

कर्जत : तालुक्यातील बीड गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. रायगड जिल्हा परिषदेने उल्हास नदीवर विहीर खोदली असून या विहिरीतील पाणी गावापर्यंत आणण्यासाठी आमदार निधीमधून १२ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता महिलांची पायपीट थांबणार आहे.बीड गावाची लोकसंख्या २००० हून अधिक लोकवस्ती असून हे गाव बोरघाटाच्या पायथ्याशी असल्याने जमिनीतील पाण्याचा साठा लवकर तळ गाठतो. त्यामुळे मार्च महिन्यापासून या भागातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी उल्हास नदीवर जावे लागते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हास नदीमध्ये येथील महिला डवरे खोदून पाणी साठवतात आणि ते पाणी हंड्यात भरून आणतात. ही समस्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे यांना २0१७ मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यानंतर पाहणी दौऱ्यात जाणवली. त्यांनी जिल्हा परिषदेकडून बीड गावासाठी एक विहीर मंजूर केली आणि उल्हास नदीवर ती विहीर बांधण्यात आली आहे. महिलांना विहिरीतून पाणी उपलब्ध झाल्याने केवळ डवरे खोदण्याचा त्रास वाचला आहे. गावात नळपाणी योजना राबविल्यास गावातील महिलांची पायपीट पूर्णपणे थांबेल.महिलांचा अधिक वेळ पिण्याचे पाणी आणण्यासाठी जात असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी तसेच कर्जत पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रभावती लोभी यांनी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांना लक्षात आणून दिली. त्यानंतर लाड यांनी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता डी. आर. कांबळे यांना बोलावून विहिरीतील पाणी गावात येण्यासाठी किती खर्च होईल याचे अंदाजपत्रक बनविण्यास सांगितले. बीड गावात पाइपलाइनने पाणी पोहचविण्यासाठी १२ लाख खर्च येणार असे स्पष्ट करताच आमदार सुरेश लाड यांनी स्थानिक विकास निधीमधील १२ लाख रु पये निधी त्या कामासाठी वर्ग करण्याचे पत्र तत्काळ देऊन बीड गावातील महिलांची पुढील वर्षांपासून पायपीट थांबवावी यासाठी प्रयत्न पूर्ण केले.