शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘पालकमंत्री कक्षा’तून ठेवणार जिल्हा प्रशासनावर अंकुश?; लालफीतशाहीतून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 00:45 IST

जिल्ह्यात पालकमंत्री कक्षाची करणार स्थापना, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

आविष्कार देसाई रायगड : नागरिकांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कामासाठी संबंधित प्रशासकीय कार्यालयात खेटे मारूनही त्यांना अपेक्षित आणि गुणात्मक समाधान मिळत नाही. यावर आता उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून ‘लोकाभिमुख सरकार’ अशी प्रतिमा निर्माण करतानाच प्रशासनावर एक प्रकारे थेट अंकुश ठेवला जाणार असल्याचे चित्र आहे.

दैनंदिन जीवन जगताना नागरिकांचा प्रशासकीय कामाशी संबंध येतो. काही वेळेला प्रशासकीय लालफीतशाही आडवी येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दोष व्यवस्थेचा असतो मात्र सरकारच्या नावाने नागरिक खडी फोडतात. सरकार आणि प्रशासन अशा कारणांमुळे संबंध बिघडण्याच्या घटनाही घडलेल्या अनुभवास आलेल्या आहेत. याच कारणासाठी राज्यातील मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ‘जनता दरबार’ अशा संकल्पना राबविल्या आहेत. त्याच धर्तीवर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुका, विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री कक्षाच्या माध्यमातून कामकाज होणार आहे. यासाठी वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा, अशी त्यांची मूळ संकल्पना असली तरी प्रशासनावरही याच माध्यमातून थेट वचक ठेवण्यात मदतच मिळणार असल्याचे दिसून येते. प्रशासन आणि सरकार हे दोन्ही घटक एकमेकांसाठी पूरक असले पाहिजेत. यातील एखादा घटक जरी वरचढ झाला तर मूळ लोकशाही व्यवस्थेला अडचणीचे ठरू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

नागरिकांशी थेट संवादपालकमंत्री कक्ष स्थापन झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधणे सोपे जाणार आहे. तसेच कामाचा निपटारा करताना गुणात्मकता जपण्याकडे स्वत: पालकमंत्र्यांचे लक्ष राहणार असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना आता थातूरमातूर उत्तर देता येणार नसल्याचे बोलले जाते. पालकमंत्री यांच्याच देखरेखीखाली नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणार असल्याने त्रास कमी होणार आहे. प्रशानाकडून लवकर होणाऱ्या कामासाठीही काही वेळा जाणीवपूर्वक उशीर होतो. त्यामुळे सातत्याने कार्यालयात खेटे मारूनही काम होत नाही. आता त्यामध्ये सुधारणा होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगड