शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘पालकमंत्री कक्षा’तून ठेवणार जिल्हा प्रशासनावर अंकुश?; लालफीतशाहीतून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 00:45 IST

जिल्ह्यात पालकमंत्री कक्षाची करणार स्थापना, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

आविष्कार देसाई रायगड : नागरिकांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कामासाठी संबंधित प्रशासकीय कार्यालयात खेटे मारूनही त्यांना अपेक्षित आणि गुणात्मक समाधान मिळत नाही. यावर आता उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून ‘लोकाभिमुख सरकार’ अशी प्रतिमा निर्माण करतानाच प्रशासनावर एक प्रकारे थेट अंकुश ठेवला जाणार असल्याचे चित्र आहे.

दैनंदिन जीवन जगताना नागरिकांचा प्रशासकीय कामाशी संबंध येतो. काही वेळेला प्रशासकीय लालफीतशाही आडवी येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दोष व्यवस्थेचा असतो मात्र सरकारच्या नावाने नागरिक खडी फोडतात. सरकार आणि प्रशासन अशा कारणांमुळे संबंध बिघडण्याच्या घटनाही घडलेल्या अनुभवास आलेल्या आहेत. याच कारणासाठी राज्यातील मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ‘जनता दरबार’ अशा संकल्पना राबविल्या आहेत. त्याच धर्तीवर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुका, विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री कक्षाच्या माध्यमातून कामकाज होणार आहे. यासाठी वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा, अशी त्यांची मूळ संकल्पना असली तरी प्रशासनावरही याच माध्यमातून थेट वचक ठेवण्यात मदतच मिळणार असल्याचे दिसून येते. प्रशासन आणि सरकार हे दोन्ही घटक एकमेकांसाठी पूरक असले पाहिजेत. यातील एखादा घटक जरी वरचढ झाला तर मूळ लोकशाही व्यवस्थेला अडचणीचे ठरू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

नागरिकांशी थेट संवादपालकमंत्री कक्ष स्थापन झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधणे सोपे जाणार आहे. तसेच कामाचा निपटारा करताना गुणात्मकता जपण्याकडे स्वत: पालकमंत्र्यांचे लक्ष राहणार असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना आता थातूरमातूर उत्तर देता येणार नसल्याचे बोलले जाते. पालकमंत्री यांच्याच देखरेखीखाली नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणार असल्याने त्रास कमी होणार आहे. प्रशानाकडून लवकर होणाऱ्या कामासाठीही काही वेळा जाणीवपूर्वक उशीर होतो. त्यामुळे सातत्याने कार्यालयात खेटे मारूनही काम होत नाही. आता त्यामध्ये सुधारणा होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगड