शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘ते’ सपनो के सौदागर गेले कुठे?-धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 06:45 IST

मोेदी सरकारवर टीका; नेरळ येथे आघाडीची सभा

कर्जत : मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखविणारे सपनो के सौदागर गेले कुठे? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेरळ येथे उपस्थित केला. नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.२०१४ मध्ये तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि देशभर फिरत त्यांनी अच्छे दिन येण्याची स्वप्ने जाहीर सभांतून दाखवली आणि त्या वेळी जनतेने त्या स्वप्नांना भुलून मोदींच्या हाती सत्ता दिली; पण त्या मोदी यांनी स्वत:चे बहुमत असताना काय केले? हे दाखवून द्यावे, असे आव्हान देताना धनजंय मुंडे यांनी, ती स्वप्ने, ती आश्वासने आणि ते सपनो के सौदागर २०१९ मध्ये अच्छे दिनबद्दल काही बोलत नाही. अशी टीका करीत मोदी आज देशात सर्वत्र अपयशी ठरल्याचे दिसून येत असून, राज्यात परिवर्तन आणून चोर लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, असे आवाहन मुंडे यांनी केले.धनंजय मुंडेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना, अमित शहा यांना प्रथम अफजल खान बोलायचे आणि कोणतेही पद नसताना आर्थिक संपत्ती कमावली म्हणून ईडीकडून चौकशीची धमकी अमित शहा यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे अफजल खानाच्या गुहेत शिरले, असा आरोप मुंडे यांनी केला. त्यांनी पुढे बोलताना, नरेंद्र मोदी चुकून कधी पंतप्रधान झाले तर ते देशात पुन्हा हुकूमशाही आणतील, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळDhananjay Mundeधनंजय मुंडे