शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मराठा आरक्षणातील न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 02:16 IST

मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत आणि १३ टक्के शिक्षणात आरक्षण देण्याबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिला आहे.

अलिबाग - मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत आणि १३ टक्के शिक्षणात आरक्षण देण्याबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिला आहे. राज्य सरकारने आपल्या अधिकाराचा वापर करत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते, मात्र न्यायालयाने ते नाकारले. मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या शिफारशी ग्राह्य धरत न्यायालयाने निर्णय दिल्याने मराठा समाजाने राज्यभर काढलेल्या महामोर्चांना अखेर यश आल्याचे बोलले जाते. न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे, तर राज्य सरकारचे देखील आभार मानण्यात येत आहेत.सकल मराठा समाजाने गेली तीन वर्षे शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले होते. त्यांचा हा विजय आहे. आघाडी सरकारच्या कालावधीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सुरुवात झाली होती. त्याला आताच्या सरकारच्या कालावधीत न्यायालयाच्या निर्णयाने मूर्तरूप आले आहे. राज्य सरकारने आता न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी ही अपेक्षा.- सुनील तटकरे, खासदार, रायगडराज्य सरकारने दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळवला होता. मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी उच्च न्यायालयाने मान्य केल्याने बऱ्याच वर्षांपासूनच प्रश्न निकाली निघाला आहे. मराठा समाजाला आता नोकरी आणि शिक्षणात संधी मिळतील.- सुभाष पाटील, आमदार, अलिबागमराठा समाजाच्या मोर्चांना अखेर यश आले. सरकारने सुरुवातीपासून सकारात्मकता दाखवली होती. त्याला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता न्यायालयाचाही निर्णय आला आहे. त्यामुळे खूपच आनंद होत आहे. सर्वांचेच खूप खूप आभार.- भरत गोगावले, आमदार, महाडमराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिल्याने हा मराठा समाजाचा विजय आहे. त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाले आहे. राज्य सरकार याबाबत नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी उभे होते. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांचे आभार.- अ‍ॅड. महेश मोहिते, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, रायगडबºयाच कालावधीपासूनची मागणी होती. ती आजच्या न्यायालयाच्या निकालामुळे पूर्ण झाली आहे. या क्रांतिकारी निर्णयामुळे समाजाला खरा न्याय मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार केला तसेच सरकारही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार.- रघुजी आंग्रे, रायगड प्राधिकरण, सदस्यन्यायालयाच्या निर्णयाने मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला निश्चितच दिशा मिळेल. नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणामुळे समाजातील युवक मागे राहणार नाहीत. हा खरेच आनंदाचा क्षण आहे. सर्वांचेच आभार.- अरविंद पाशिलकर, भारतीय मराठा महासंघ, रायगड

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण