शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने भातपिकासह आंबाही संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 01:03 IST

५० हजार हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान झाल्याची भीती : पालवी कोमजल्याने आंबा निर्यातीवर होणार परिणाम

आविष्कार देसाई।अलिबाग : रायगड जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुलै-आॅगस्ट आणि आॅक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत तब्बल सुमारे ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त भातपिकाचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर आंब्याची पालवीही कोमजल्याने तब्बल १५ हजार टन निर्यात होणाऱ्या आंब्यालाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि आंबा बागायतदार असे दोघेही आर्थिक खाईत लोटले जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यातील ९५ हजार हेक्टरवर भाताचे पीक घेतले गेले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी भाताचेच पीक घेत असल्याने भातपिकाचे चांगलेच उत्पादन येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलेही भात भिजल्यामुले हातातोंडाशी आलेला घासही गेला आहे. पावसाने शेतातील भाताचे पीक आडवे झाल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.जुलै-आॅगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे १७ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले होते. तसेच आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पडलेल्या परतीच्या पावसामुळे २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा हा ३७ हजार हेक्टरवर पोहोचल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात आॅक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीतील परतीच्या पावसामुळे ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याची भीती राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त के ली.अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतीचेही प्रचंड नुकसान होणार आहे. आंब्याला पालवी फुटतानाच पावसाने तडाखा दिल्याने पालवी कोमजली आहे. आपल्या विभागातून तब्बल १५ हजार टन आंब्याची निर्यात केली जाते. त्यामुळे येथील आंबा बागायतदारांना चांगल्या प्रमाणात परकीय चलन मिळते. मात्र, या वर्षी आंबा उशिरा येणार असल्याने त्याची चव उशिरा चाखायला मिळणार आहे. शिवाय, आंबा निर्यातीवरही विपरित परिणाम होऊन आंबा बागायतदारांसमोर आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, असेही मोकल यांनी स्पष्ट केले.१७ हजार ५०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झालेपरतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने संबंधित जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याला सुरुवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार ६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील २० हजार हेक्टरवरील भाताच्या पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यापैकी १७ हजार ५०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असल्याचा दावा निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आंब्यालाही पावसाचा फटका बसणार - शेळकेजुलै-आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीने १७ हजार हेक्टरवरील भाताचे पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांतील परतीच्या पावसामुळे आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रावरील भाताचे पीक वाया गेले आहे. पाऊस ठिकठिकाणी सुरूच असल्याने नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंब्यालाही पावसाचा फटका बसणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. 

 

टॅग्स :MangoआंबाRaigadरायगडRainपाऊस