शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

आकाशाकडे लागले पाणावलेले डोळे; पाऊस नसल्याने रखडली लावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 1:23 AM

शेतकरी चिंतातुर; भाताची रोपे पिवळी पडण्याची भीती

निखिल म्हात्रे

अलिबाग : मान्सूनपूर्व पावसामुळे पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झाल्यामुळे शंभर टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी भाताला अंकुर आल्याने भात पेरण्यांना पाण्याची अत्यावश्यकता आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे.

खरीप हंगामात १ लाख ५ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. मात्र, पावसाने दिलेल्या सततच्या हुलकावणीमुळे भात लावणीचे संकट उभे राहिले आहे. या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात शेतीस पोषक असा पाऊस झाला. त्यामुळे धूळपेरणी केलेल्या भाताची रोपे चांगली उगवली. मधल्या काळात पावसाने हुलकावणी दिल्याने भाताची रोपे उत्तम आलेली असूनही आता शेतकरीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या नांगर व टॅÑक्टरच्या मदतीनेही शेतजमिनीची मशागत करण्यात येत आहे. बैल-जोडीच्या वाढत्या किमतीमुळे अनेक शेतकºयोंजवळ बैलजोडी राहिलेली नाही, शिवाय मजुरांकडून कामे करण्यास वेळही लागतो व कामेही लवकर होत नसल्याने रान मोकळे करण्यासाठी व मशागतीची कामे त्वरित उरकण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच ही कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत.पावसाच्या विश्रांतीने शेतकरी हवालदिलपोलादपूर : कोकणासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, ७ जूननंतर मान्सूनने दमदार हजेरी लावली होती. यामुळे भातपिके लावणीयोग्य झाली असून, पोलादपूर तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने, भाताची रोपे पावसाअभावी सुकून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे शेतकºयांनी वेळेत उरकली. त्यानंतर, उखळ आणि दुवर व्यवस्थित करण्यात आली. मात्र, पाऊस वेळेवर न पडल्यास हाताशी आलेले रोपे वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. पुन्हा एकदा निसर्ग कोकणी माणसाची परीक्षा पाहतो की काय? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. निसर्गावर अवलंबून असणाºया शेतकºयाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणू, ३ जून रोजी झालेले निसर्ग चक्रीवादळ, यामुळे हवालदिल झालेले शेतकरी, व्यापारी, दुकानदार, नोकर या सर्वांचीच तारांबळ उडाली होती. मात्र, पावसाच्या आगमनानंतर शेतकºयांनी भाताची लागवड के ली.आज भातपिके लावणी योग्य झाली असताना, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.निसर्गाच्या फे ºयाने वैतागला बळीराजाशेतकºयांना प्रत्येक हंगामी पिकावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज बदलते हवामान अशा या निसर्गाच्या फेºयाला बळीराजा वैतागला आहे. जून महिना उलटून जायला आला, तरी अद्याप पावासाला सुरु वात झाली नसल्याने भातपिके करपली आहेत. ती जगविण्यासाठी सध्या शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे हे देवा, भरपूर पाऊस पडू दे. माझ्या बळीराजाचे राज्य येऊ दे, अशी व्यथा गोंधळपाडा येथे राहणारे शेतकरी अमर लोंढे यांनी मांडली आहे.भातपेरणीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले. मान्सून लांबल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली, तर भात लावणीच्या कामांना वेळेत सुरुवात होणार आहे. - पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस