शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:37 IST

रायगड जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. कर्जत, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये २२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. कर्जत, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये २२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. तब्बल ७६ लाख लिटर पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाणार असल्याने तेथील पाणीटंचाईवर प्रशासनाला सहज मात करता येणार आहे. तीन तालुक्यांत योजना यशस्वी झाल्यामुळे आता १२ तालुक्यांत १८१ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीत करोडो लिटर पावसाचे पाणी साठवण्याच्या दिशेने जिल्ह्याचे सकारात्मक पाऊल पडले आहे.जिल्ह्यामध्ये सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजणारी धरणे आहेत, तर लघुपाट बंधारेअंतर्गत २८ लहान धरणे आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने पहिल्या पावसात आठवडाभरातच सदरची धरणे भरण्यास सुरुवात होते. जुलै महिन्यामध्ये तर ही धरणे दुथडी भरून वाहू लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. पावसाच्या पाण्याचा म्हणावा तसा उपयोग केला जात नसल्याने जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते.पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामध्ये महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यावर मात करण्यासाठी सरकारने जलस्वराज्य टप्पा-२ आखला. त्यामध्ये पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली. २०१४-२०२० या कालावधीसाठी ही योजना आखण्यात आली आहे. यासाठी जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यासाठी २७ पाण्याच्या टाक्या मंजूर करण्यात आल्या होत्या. पोलादपूर तालुक्यात १४ पैकी १३ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. महाड तालुक्यात आठ टाक्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. तेथे सहा टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. कर्जत तालुक्यामध्ये चार टाक्यांपैकी तीन टाक्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. रोहे तालुक्यातील उसर ठाकूरवाडी येथील एक टाकी मंजूर करण्यात आली होती. मात्र, नंतर ती रद्द करण्यात आली. २७ पैकी २२ टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने त्या टाक्या भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. २२ टाक्यांची एकूण क्षमता ही तब्बल ७६ लाख लिटर आहे. यंदाच्या पावसामध्ये त्या टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवले जात आहे. त्या पाण्याचा उपयोग टंचाईच्या कालावधीत नागरिकांना होणार असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागायची ती आता थांबणार आहे.पोलादपूर, महाड, कर्जतमध्ये यशपोलादपूर, महाड आणि कर्जत तालुक्यामध्ये ही योजना यशस्वी ठरल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने सरकारकडे आणखीन १८१ ठिकाणी योजना राबवण्याची तयारी दाखवली, मात्र कालावधी कमी असल्याने त्याला मान्यता मिळत नव्हती.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सातत्याने पाठपुरवा करून रायगड जिल्ह्याच्या पदरात १८१ टाक्यांचे दान पाडून घेतले आहे. त्यामुळे आता नव्याने १२ तालुक्यांमध्ये १८१ टाक्या बांधण्यातील प्रमुख अडथळा आता दूर झाला आहे, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखील जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. यासाठी पाऊस पाणी संकलन योजना महत्त्वपूर्ण आहे. १८१ टाक्यांमुळे जिल्ह्यातील गावे टँकरमुक्त होण्यास मदत मिळणार आहे.- अभय यावलकर,मुख्यकार्यकारी अधिकारी

टॅग्स :Waterपाणी