शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई ?

By admin | Updated: February 24, 2016 03:03 IST

हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एकूण ८७ गावे व २१२ वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवणी आदी नद्या वाहतात.

पोलादपूर : हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एकूण ८७ गावे व २१२ वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवणी आदी नद्या वाहतात. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात. मात्र यंदा काही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.पोलादपूर तालुक्यात एकूण नऊ धरणे प्रस्तावित आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे सुरूच झाली नाहीत. या वर्षी कोकणात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने डिसेंबरपासूनच पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात होता, मात्र यावर्षी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन शासनामार्फत केले आहे, यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये सहभागाबद्दल निरुत्साह दिसून येत आहे. या वर्षी भीषण पाणीटंचाई भासणार असून पोलादपूर पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविलेल्या टंचाई आराखड्यात एकूण १३९ विंधन विहीर, ३२ गावे, ११८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तालुक्यातील चिरेखिंड, वाकण मुरावाडी, कोसमवाडी, आंबेमाची, केवनाळे, कातली बंगला, कालवली भोसले वाडी, विठ्ठलवाडी आदी गावांचा सामवेश आहे. साधारणत: मार्च अखेरपर्यंत या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल असा ग्रामस्थांनी अंदाज वर्तविला आहे. तर पंचायत समितीने पाठविलेल्या आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजित २१.७४ लाखांची तरतूद केली आहे. विंधन विहिरीसाठी ५५.६० लाखांची तरतूद आहे. कोतवाल, कामथे, किनेश्वर गोळेगणी, सवाद आदी ठिकाणी धरणे प्रस्तावित असून एकाही धरणाचे काम झाले नाही. एकमेव देवळे धरण पूर्ण झाले असले तरी त्या धरणाची पाणीगळती काढण्यात लघुपाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.बंधाऱ्यांची गरजचिरेखिंड येथील ईश्वर ढेबे यांनी टंचाईबाबत प्रतिक्रि या देताना सांगितले की, दरवर्षी शिमग्यानंतर आम्हाला जीवन नकोसे होते. हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. तर रोजगार सोडून दिवसभर बायकापोरं पाण्यासाठी वणवण भटकत राहतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ओढ्यानाल्यावर व नदीवर छोटे छोटे बंधारे होणे गरजेचे असून शिवकालीन पाणी योजना पुनर्जीवित कराव्या लागतील, तरच पोलादपूरचा पाणीटंचाई प्रश्न काही प्रमाणात सोडवता येईल.