शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई ?

By admin | Updated: February 24, 2016 03:03 IST

हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एकूण ८७ गावे व २१२ वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवणी आदी नद्या वाहतात.

पोलादपूर : हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एकूण ८७ गावे व २१२ वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवणी आदी नद्या वाहतात. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात. मात्र यंदा काही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.पोलादपूर तालुक्यात एकूण नऊ धरणे प्रस्तावित आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे सुरूच झाली नाहीत. या वर्षी कोकणात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने डिसेंबरपासूनच पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात होता, मात्र यावर्षी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन शासनामार्फत केले आहे, यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये सहभागाबद्दल निरुत्साह दिसून येत आहे. या वर्षी भीषण पाणीटंचाई भासणार असून पोलादपूर पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविलेल्या टंचाई आराखड्यात एकूण १३९ विंधन विहीर, ३२ गावे, ११८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तालुक्यातील चिरेखिंड, वाकण मुरावाडी, कोसमवाडी, आंबेमाची, केवनाळे, कातली बंगला, कालवली भोसले वाडी, विठ्ठलवाडी आदी गावांचा सामवेश आहे. साधारणत: मार्च अखेरपर्यंत या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल असा ग्रामस्थांनी अंदाज वर्तविला आहे. तर पंचायत समितीने पाठविलेल्या आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजित २१.७४ लाखांची तरतूद केली आहे. विंधन विहिरीसाठी ५५.६० लाखांची तरतूद आहे. कोतवाल, कामथे, किनेश्वर गोळेगणी, सवाद आदी ठिकाणी धरणे प्रस्तावित असून एकाही धरणाचे काम झाले नाही. एकमेव देवळे धरण पूर्ण झाले असले तरी त्या धरणाची पाणीगळती काढण्यात लघुपाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.बंधाऱ्यांची गरजचिरेखिंड येथील ईश्वर ढेबे यांनी टंचाईबाबत प्रतिक्रि या देताना सांगितले की, दरवर्षी शिमग्यानंतर आम्हाला जीवन नकोसे होते. हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. तर रोजगार सोडून दिवसभर बायकापोरं पाण्यासाठी वणवण भटकत राहतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ओढ्यानाल्यावर व नदीवर छोटे छोटे बंधारे होणे गरजेचे असून शिवकालीन पाणी योजना पुनर्जीवित कराव्या लागतील, तरच पोलादपूरचा पाणीटंचाई प्रश्न काही प्रमाणात सोडवता येईल.