शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: March 14, 2016 01:59 IST

रायगड जिल्ह्यात कडक उन्हाचे चटके असह्य होत असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. पेण तालुक्यात प्रत्यक्षपणे दोन आणि खालापूर तालुक्यात एका

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यात कडक उन्हाचे चटके असह्य होत असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. पेण तालुक्यात प्रत्यक्षपणे दोन आणि खालापूर तालुक्यात एका ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याला सुरुवात झाली आहे. येत्या कालावधीत महाड तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून त्या खालोखाल पेण, पोलादपूर आणि अलिबाग तालुक्याचा समावेश टंचाई कृती आराखड्यात आहे. महाड तालुक्यातील २९४ गावे-वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून त्या खालोखाल पेण (२०० गावे- वाड्या), पोलादपूर (१८२ गावे- वाड्या) . रायगड जिल्ह्यात २०१५-१६ या कालावधीत सरासरी तीन हजार १४२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २८ धरणांमध्ये सुमारे ६९ टक्के पाणी साठा झाला होता. आता त्यामध्ये घट होऊन तो ४६ टक्क्यांवर आला आहे. मोठ्या संख्येने पडणारा पाऊस हा अस्तित्वात असलेल्या धरणात साठविण्यासाठी ती धरणे कमी पडत आहेत. धरणांतून मोठ्या संख्येने गाळ काढून त्यांचे पात्र वाढविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे पेण तालुक्यातील असणाऱ्या हेटवणे धरणातून सुमारे १०० द.ल.घ.मी. पाणी नियोजनाअभावी वाया जात आहे. त्याचे नियोजन केल्यास पेणमध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही. त्याचप्रमाणे अंबा तीर कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. या कालव्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जमीनही भिजणार असून शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत मिळणार आहे. अर्धवट, रखडलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनांना गती देण्याची गरज आहे. टंचाई कृती आराखड्यामध्ये अग्रक्रमांक महाड तालुक्याचा लागत आहे. महाड तालुक्यामध्ये तीन हजार ४५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळणार आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या सुमारे १५ योजना कार्यान्वित झाल्या आहेत. तालुक्याला खैर धरणातील पाणीपुरवठा होतो. त्याचप्रमाणे १८ गावे २९ वाड्या प्रादेशिक योजनेचा समावेश आहे. वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे या लघु पाटबंधारे प्रकल्पांचाही समावेश महाड तालुक्यात होतो. गेल्यावर्षी महाडमध्ये सुमारे ८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.130 गावे- वाड्यांचा अलिबाग तालुक्यातील टंचाई कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. मे महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा कमी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांनाच बसल्याचे दिसून येत आहे.पेण तालुक्यात दोन हजार ९३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी शहापाडा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे शहापाडा धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर हेटवणे धरणातील पाणी लीफ्ट करुन शहापाडा धरणात सोडण्यात येते. हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाइपलाइनवर सुमारे ४२ गावांना नळ कनेक्शन जोडले आहेत. रानबाजिरेतून पाणीपोलादपूर तालुक्यातही तीन हजार ७१२ मिलीमीटर पाऊस झाला होता. अख्ख्या पोलादपूर तालुक्याची तहान रानबाजिरे धरणाच्या पाण्यातून भागविली जाते. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पोलादपूरला गेल्या वर्षी चार टँकरची गरज भासली होती.एमआयडीसीमार्फत पाणीअलिबाग तालुक्यामध्ये दोन हजार १३१ मि.मी. पाऊस झाला होता. तीनवीरा धरण, उमटे धरण, श्रीगाव धरण आणि कामार्ले धरण आहे. यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे शहराची तहान एमआयडीसीमार्फत भागविली जाते. कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कार्ले हे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. सप्टेंबर २०१५ मध्येच पाण्याचे नियोजन करावे याबाबतचे पत्र संबंधित विभागांना देण्यात आले होते. त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले. पेण तालुक्यात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. पेण तालुक्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने यंदा मार्च महिन्यात काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. टंचाई असणाऱ्या ठिकाणी मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येईल.-अरविंद टोरो, कार्यकारी अभियंता