शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पेणमध्ये वाशी खारेपाटात पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जनतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:31 IST

public demand for water supply by tanker : चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक राबविण्यात येऊन देखील गेले दहा दिवस पाणीपुरवठा न झाल्याने महिला वर्गांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पेण : शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणारे शहापाडा धरणातील पाणीसाठा संपूर्णपणे संपला आहे. जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध कसे करायचे हा मोठा गहन प्रश्न सध्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सतावतो आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक राबविण्यात येऊन देखील गेले दहा दिवस पाणीपुरवठा न झाल्याने महिला वर्गांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  सरकारकडून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाळेबंदीचा इशारा देण्यात आला आहे. जर टाळेबंदी लागू केली तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी काय करावे या भीषण पाणीटंचाई समस्येमुळे महिलांची झोप उडाली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी या समस्येचा निपटारा करण्यासाठी टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे.      तहानेने व्याकूळ झालेल्या वाशी विभागातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला भविष्याचे नियोजन करता आले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत ३० कोटीची हेटवणे शहापाडा धरणांना जोडणारी योजनेचे काम अपूर्ण आहे. काम करणारा ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेल्यावर दीड वर्षात एमजेपीच्या अधिकाऱ्यांने काय दिवे लावले येथील पाणीटंचाई समस्येची इथंभूत माहिती या यंत्रणांना असून देखील राजकीय नाकर्तेपणामुळे जनतेला पिण्याचे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

समस्या २५ वर्षांपासून कायमपाणीटंचाईची समस्या तब्बल २५ वर्षे कायम ठाण मांडून बसली आहे. दरवर्षी मार्चमध्ये सुरू होणारी पाणीटंचाई समस्येची दाहकता यावर्षी मात्र फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी सुरू झाली आहे. गेले २० दिवस जनतेला गढूळ पाणीपुरवठा होत होता तोही आता कमी दाबाने जेमतेम होतो आहे. गावातील पाच टक्के घरांना पाणीपुरवठा होतो. ९५ टक्के घरांमध्ये ठणठणाट असतो. ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांनी पहाणी केली. 

पाण्यासाठी बैठकांचा सिलसिला जूनचा पाऊस पडेपर्यंत करायचे काय याचे प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल. पाण्याने श्रीमंत असलेल्या हेटवणे धरणाचे पाणी सिडकोची तहान भागवत आहे. मात्र स्थानिक जनतेला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकावे लागते. पाण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू असतो मात्र​ याबाबत उपाययोजना करण्यात प्रशासनाला नेहमीच अपयश येते. आता तरी टँकर सुरु करुन तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करावा ही मागणी आहे.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी