शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पेणमध्ये वाशी खारेपाटात पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जनतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:31 IST

public demand for water supply by tanker : चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक राबविण्यात येऊन देखील गेले दहा दिवस पाणीपुरवठा न झाल्याने महिला वर्गांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पेण : शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणारे शहापाडा धरणातील पाणीसाठा संपूर्णपणे संपला आहे. जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध कसे करायचे हा मोठा गहन प्रश्न सध्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सतावतो आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक राबविण्यात येऊन देखील गेले दहा दिवस पाणीपुरवठा न झाल्याने महिला वर्गांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  सरकारकडून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाळेबंदीचा इशारा देण्यात आला आहे. जर टाळेबंदी लागू केली तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी काय करावे या भीषण पाणीटंचाई समस्येमुळे महिलांची झोप उडाली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी या समस्येचा निपटारा करण्यासाठी टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे.      तहानेने व्याकूळ झालेल्या वाशी विभागातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला भविष्याचे नियोजन करता आले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत ३० कोटीची हेटवणे शहापाडा धरणांना जोडणारी योजनेचे काम अपूर्ण आहे. काम करणारा ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेल्यावर दीड वर्षात एमजेपीच्या अधिकाऱ्यांने काय दिवे लावले येथील पाणीटंचाई समस्येची इथंभूत माहिती या यंत्रणांना असून देखील राजकीय नाकर्तेपणामुळे जनतेला पिण्याचे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

समस्या २५ वर्षांपासून कायमपाणीटंचाईची समस्या तब्बल २५ वर्षे कायम ठाण मांडून बसली आहे. दरवर्षी मार्चमध्ये सुरू होणारी पाणीटंचाई समस्येची दाहकता यावर्षी मात्र फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी सुरू झाली आहे. गेले २० दिवस जनतेला गढूळ पाणीपुरवठा होत होता तोही आता कमी दाबाने जेमतेम होतो आहे. गावातील पाच टक्के घरांना पाणीपुरवठा होतो. ९५ टक्के घरांमध्ये ठणठणाट असतो. ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांनी पहाणी केली. 

पाण्यासाठी बैठकांचा सिलसिला जूनचा पाऊस पडेपर्यंत करायचे काय याचे प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल. पाण्याने श्रीमंत असलेल्या हेटवणे धरणाचे पाणी सिडकोची तहान भागवत आहे. मात्र स्थानिक जनतेला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकावे लागते. पाण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू असतो मात्र​ याबाबत उपाययोजना करण्यात प्रशासनाला नेहमीच अपयश येते. आता तरी टँकर सुरु करुन तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करावा ही मागणी आहे.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी