शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोहा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: March 19, 2017 05:36 IST

रोहा तालुक्यात दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत येथील बहुतांश भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे

रोहा : रोहा तालुक्यात दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत येथील बहुतांश भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात. तीव्र उष्णतेमुळे तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट कोसळत असल्याने या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाईग्रस्त गाव व वाड्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती मूळ आराखडा तयार केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा आराखडा प्रस्ताव मंजुरीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र, पुढील कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याने यंदाच्या संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रस्तावावर शासनाकडून पाणी तर फिरणार नाही ना? अशी भीती टंचाईग्रस्त भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.रोहा तालुक्यात उन्हाळी पाणीटंचाईची झळ आतापासून बसू लागली आहे. उन्हाळ्यात नगरपालिका हद्दीत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अनेक भागांत २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने भयानक दृश्य दिसून येत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. निवडणुकीत आश्वासनांची बरसात करणारे पुढारी मात्र पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांची पाणीसमस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. डोंगर दुर्गम भागात राहणाऱ्या महिला सार्वजनिक विहिरींचा वापर करताना दिसतात, तर काही जण कुंडलिकानदी व कालवा भागातून वाहनाद्वारे (बैलगाडी) ग्रामीण भागात पाणीपुरवठा करीत असल्याचे दृश्य रोह्यात दिसून येत आहे.रोहे तालुक्यात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती मूळ आराखडा गोषवारा तयार असून, तालुक्यातील (उसर) ठाकूरवाडी, (पिंगळसई) साळवी वाडा, (वरवडे) बौद्धवाडी, सोनगाव, धामणसई, गावठाण, (धामणसई) बौद्धवाडी, (भालगाव) फणसवाडी अशी एकूण ३ गावे व ५ वाड्यांवर असणाऱ्या २३८१ लोकांकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. याकरिता अंतर्गत ४ लाख ८० हजार खर्च होणार आहे. या संभाव्य पाणीटंचाई संदर्भात रोहा पंचायत समिती कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना अद्याप वेळ मिळत नसल्याने या प्रस्तावाची फाइल पुढे सरकत नाही. दरवर्षी येथील दुर्गम भागांना पंचायत समितीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतो. अर्थातच, किमान जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतच याकामाचे आदेश प्राप्त होत असतात; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींमुळे यंदा या कामाला उशीर झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदेश येताच नियोजित गावे व वाड्यांना पाणी देण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)पाणीटंचाई कृ ती आराखडा सादर के ला आहे. आता पाहणी अहवाल देणे आहे. सध्या तरी उसर ठाकू रवाडी येथे भीषण पाणीटंचाई आहे. तेथे हातपंप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढे एप्रिलमध्ये परिस्थिती पाहून पुरवणी आराखडा सादर के ला जाईल. जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानंतर रोहा तहसीलदारांनी उपलब्ध करून दिलेल्या टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल.- बी. टी. जायेभाये, गटविकास अधिकारी, रोहा