शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रोहा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: March 19, 2017 05:36 IST

रोहा तालुक्यात दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत येथील बहुतांश भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे

रोहा : रोहा तालुक्यात दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत येथील बहुतांश भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात. तीव्र उष्णतेमुळे तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट कोसळत असल्याने या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाईग्रस्त गाव व वाड्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती मूळ आराखडा तयार केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा आराखडा प्रस्ताव मंजुरीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र, पुढील कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याने यंदाच्या संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रस्तावावर शासनाकडून पाणी तर फिरणार नाही ना? अशी भीती टंचाईग्रस्त भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.रोहा तालुक्यात उन्हाळी पाणीटंचाईची झळ आतापासून बसू लागली आहे. उन्हाळ्यात नगरपालिका हद्दीत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अनेक भागांत २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने भयानक दृश्य दिसून येत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. निवडणुकीत आश्वासनांची बरसात करणारे पुढारी मात्र पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांची पाणीसमस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. डोंगर दुर्गम भागात राहणाऱ्या महिला सार्वजनिक विहिरींचा वापर करताना दिसतात, तर काही जण कुंडलिकानदी व कालवा भागातून वाहनाद्वारे (बैलगाडी) ग्रामीण भागात पाणीपुरवठा करीत असल्याचे दृश्य रोह्यात दिसून येत आहे.रोहे तालुक्यात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती मूळ आराखडा गोषवारा तयार असून, तालुक्यातील (उसर) ठाकूरवाडी, (पिंगळसई) साळवी वाडा, (वरवडे) बौद्धवाडी, सोनगाव, धामणसई, गावठाण, (धामणसई) बौद्धवाडी, (भालगाव) फणसवाडी अशी एकूण ३ गावे व ५ वाड्यांवर असणाऱ्या २३८१ लोकांकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. याकरिता अंतर्गत ४ लाख ८० हजार खर्च होणार आहे. या संभाव्य पाणीटंचाई संदर्भात रोहा पंचायत समिती कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना अद्याप वेळ मिळत नसल्याने या प्रस्तावाची फाइल पुढे सरकत नाही. दरवर्षी येथील दुर्गम भागांना पंचायत समितीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतो. अर्थातच, किमान जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतच याकामाचे आदेश प्राप्त होत असतात; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींमुळे यंदा या कामाला उशीर झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदेश येताच नियोजित गावे व वाड्यांना पाणी देण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)पाणीटंचाई कृ ती आराखडा सादर के ला आहे. आता पाहणी अहवाल देणे आहे. सध्या तरी उसर ठाकू रवाडी येथे भीषण पाणीटंचाई आहे. तेथे हातपंप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढे एप्रिलमध्ये परिस्थिती पाहून पुरवणी आराखडा सादर के ला जाईल. जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानंतर रोहा तहसीलदारांनी उपलब्ध करून दिलेल्या टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल.- बी. टी. जायेभाये, गटविकास अधिकारी, रोहा