शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

दिघीच्या हलगर्जीमुळे रस्त्यावर पाणी

By admin | Updated: June 26, 2016 00:18 IST

मुरुड - आगरदांडा येथील दिघी पोर्ट कंपनीने आपल्या गेटसमोरच्या मोरी बंद केल्याने पावसाचे पाणी कंपनीच्या गेटसमोरच्या रस्त्यावर ५ फूट साचल्यामुळे संपूर्ण वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

आगरदांडा : मुरुड - आगरदांडा येथील दिघी पोर्ट कंपनीने आपल्या गेटसमोरच्या मोरी बंद केल्याने पावसाचे पाणी कंपनीच्या गेटसमोरच्या रस्त्यावर ५ फूट साचल्यामुळे संपूर्ण वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पाणी तुंबल्यामुळे व रस्त्यात खड्डे असल्यामुळे वाहनचालकाला त्या पाण्यातून गाडी काढणे अवघड होत होते तसेच सकाळी कामावर जाणारे कामगर कामावर जाऊ शकले नाहीत. हे कळताच मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नंतर कंपनीचे गेट उघडून कंपनीच्या आतील पाण्याचा मार्ग मोकळा करून तसेच कंपनीच्या जागेतून जाणारा नैसर्गिक पाण्याचा जो मार्ग कंपनीने बंद केला होता, तो तत्काळ मोकळा केल्याने काही तसांतच पाणी ओसरू लागले. त्यानंतर या विषयी तहसीलदार उमेश पाटील यांनी दिघी पोर्ट कंपनीचे व्यवस्थापक यांना नोटीस बजावून या संदर्भात येत्या ३८ तारखेला कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, मुरुड ते रोहा या मुख्य रस्त्याला आगरदांडा येथे पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन असंख्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असतो. पाणी ओसरल्यावरच वाहतूक सुरू होते. परिणामी तीन तीन तास देखील प्रवाशांना या ठिकाणी ताटकळत बसावे लागते. शनिवारी मुरुड तालुक्यात एकाच दिवसात १०५ मि.मी. पाऊस पडल्याने आगरदांडा येथे दिघी पोर्टच्या गेटपासून १ किलो मीटरच्या आसपास ५ फुटापेक्षा जास्त पाणी साचल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहतूककोंडी पाहावयास मिळाली.सार्वजनिक बांधकाम खाते याबाबत कोणतीच कार्यवाही करीत नसून, फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी त्याच्या या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. दिघी पोर्ट कंपनीने तातडीने या बाबीकडे लक्ष देऊन या समस्याचे निरसन करावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)