शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

भिरा धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:10 IST

जयंत धुळप अलिबाग: गेल्या चोवीस तासांत रायगड जिल्ह्यातील गिरिस्थान माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक २६२ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे २९८ मि.मी. पाऊस झाल्याने महाडच्या सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली. तसेच भिरा धरणाची पातळी ९५.०८ मीटर झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणाचे तीन दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले. हा विसर्ग दुपारी एक ...

जयंत धुळप अलिबाग: गेल्या चोवीस तासांत रायगड जिल्ह्यातील गिरिस्थान माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक २६२ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे २९८ मि.मी. पाऊस झाल्याने महाडच्या सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली. तसेच भिरा धरणाची पातळी ९५.०८ मीटर झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणाचे तीन दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले. हा विसर्ग दुपारी एक वाजता १०४ क्यूसेक्स होता, तर दुपारी तीन वाजता अरबी समुद्रास असणारी भरती आणि संभाव्य उसळणाऱ्या मोठ्या लाटा अशी एकाच वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सावित्री आणि कुंडलिका नदी किनारच्या गावांमध्ये काहीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. परंतु भरतीचा आणि पावसाचा जोर तुलनात्मकदृष्ट्या कमी राहिल्याने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नाही आणि प्रशासनासह सर्वांनी नि:श्वास टाकला.दहा तालुक्यांत होता पावसाचा जोरदरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी पोलादपूर-१२५ मि.मी., पेण-१२० मि.मी.,पनवेल-११९ मि.मी.,कर्जत-९३ मि.मी.,माणगांव-८५ मि.मी., म्हसळा-७५ मि.मी., खालापूर-६४ मि.मी., महाड-६४ मि.मी., तळा-६१मि.मी. ,रोहा-५७ मि.मी. या ठिकाणी पावसाचा जोर होता. मात्र श्रीवर्धन-४२मि.मी., अलिबाग २९ मि.मी., मुरु ड-१६ मि.मी., उरण-२५ मि.मी., सुधागड-३८ मि.मी. या ठिकाणी पावसाचा जोर कमी होता.दुपारी वाढलेली नद्यांची जलपातळी संध्याकाळी नियंत्रणातजिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलपातळीत दुपारी झालेली वाढ संध्याकाळी पाच वाजता मात्र कमी आली असून सद्यस्थितीत नद्यांची जलपातळी प्रत्यक्ष (धोकापातळी)मीटरमध्ये कुंडलिका नदी-२३.५०(२३.९५), अंबा नदी -७(९), सावित्री नदी -६.१०(६.५०), पाताळगंगा - १९(२१.५२), उल्हास नदी - ४५.४०(४८.७७), गाढी नदी - ३(६.५५) अशी असल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.>रसायनीत वादळी वाºयाने जनजीवन विस्कळीतमोहोपाडा : रसायनी व आसपासच्या परिसरात सोमवारी पहाटेपासूनच दुपारपर्यंत सुरू असलेल्या वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यावेळी परिसरात ठिकठिकाणी जुनाट वृक्ष उन्मळून पडले तर आसपासच्या परिसरात काही भागात घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. तसेच मोहोपाडा-पराडे या रस्त्यावर काही वृक्ष उन्मळून पडले. यावेळी रस्त्याशेजारील दुकानाचे नामफलक कोसळले, तर काही ठिकाणी घरावरील पत्रे, ताडपत्रीचे मांडव कोसळून पडले.मोहोपाडा येथील एचओसी वसाहतीत श्री साईबाबा मंदिराकडे जाणाºया रस्त्यावर दोन भलेमोठे जुनाट वृक्ष उन्मळून पडल्याने एचओसी कॉलनीतून मोहोपाडाकडे जाणारी रहदारी बंद होती. हे जुनाट वृक्ष वीजवाहिनीवर आल्याने वीज मंडळाच्या कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. वादळी वाºयाने परिसरात ठिकठिकाणी नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.>पावसामुळे वाहतूक ठप्प, घरांची पडझडदरम्यान, सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे, गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर येथे महामार्गावर झाड पडल्याने वाहतूक मंदावली होती. मात्र झाड तत्काळ हटविण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. महाड येथील दस्तुरी नाका ते नाते खिंड रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती.म्हसळा तालुक्यातील देवघर कोंड येथील काशिनाथ गिजे यांच्या घराचा काही भाग पावसाने कोसळून नुकसान झाले, मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. म्हसळा तालुक्यातच तुरु ंबाडी येथील गजानन गोया कोळी यांच्या घराचे सर्व पत्रे पाऊस आणि वादळी वाºयामुळे उडाल्याने घराचे नुकसान झाले आहे, मात्र जीवित हानी झालेली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगड