शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंबोली धरणातील पाणी सोेडण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 02:20 IST

दहा किमीतील गावांना फायदा : पाणीटंचाई कमी करण्यासाठी उपाययोजनांची गरज

मुरुड जंजिरा : तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत सुमारे २० कोटी रुपये खर्च करून धरण बांधण्यात आले. आंबोली धरणात मोठा पाणीसाठा असूनही धरणाच्या आजूबाजूला दहा कि.मी. परिसरात असणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवते.

धरणातून कालवे काढण्याची मागणी आमदार पंडित पाटील यांनी अनेकदा शासनाकडे केली आहे. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने कालव्यांची कामे रखडली आहेत. पाणीटंचाई दूर करायची असले तर अस्तित्वात असलेल्या कालव्यातून पाणी सोडणे आवश्यक आहे. हे पाणी सोडल्यास ते जमिनीत मुरेल आणि विहिरी व व कूपनलिकांद्वारे नागरिकांना उपलब्ध होईल. त्यामुळे आंबोली धरणातील कालव्यांची कामे व अस्तित्वात असलेल्या कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी शेकापचे तालुका चिटणीस व नगरसेवक मनोज भगत यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबोली येथील धरणातील कालव्यांची कामे रखडली आहेत. तसेच मुबलक पाणी असूनसुद्धा पाणी न सोडल्यामुळे या धरणातील आजूबाजूच्या गावात मोठ्या भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आंबोली धरण हे हेटवणे लघु पाटबंधारे विभाग रायगड याच्या अंतर्गत येते; परंतु या विभागाचे धरणाकडे दुर्लक्ष झाले असून या ठिकाणी अधिकारी वर्ग फिरकतच नाही, त्यामुळे लोकहिताचे निर्णयही घेता आलेले नाहीत. मुबलक पाणीसाठा असताना पाणी न सोडल्याने येथील विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चरणातील पाणी कालव्याद्वारे सोडल्यास, पाणी आंबोली ते तेलवडे व माझेरी, खोकरी भागापर्यंत उपलब्ध होण्यास मदत होईल. यासाठी लवकरच मुरु ड तहसीलदार यांची भेट घेणार असून धरणाचे पाणी सोडण्याची मागणी करणार असल्याचे नगरसेवक मनोज भगत यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी