शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली धरणातील पाणी सोेडण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 02:20 IST

दहा किमीतील गावांना फायदा : पाणीटंचाई कमी करण्यासाठी उपाययोजनांची गरज

मुरुड जंजिरा : तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत सुमारे २० कोटी रुपये खर्च करून धरण बांधण्यात आले. आंबोली धरणात मोठा पाणीसाठा असूनही धरणाच्या आजूबाजूला दहा कि.मी. परिसरात असणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवते.

धरणातून कालवे काढण्याची मागणी आमदार पंडित पाटील यांनी अनेकदा शासनाकडे केली आहे. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने कालव्यांची कामे रखडली आहेत. पाणीटंचाई दूर करायची असले तर अस्तित्वात असलेल्या कालव्यातून पाणी सोडणे आवश्यक आहे. हे पाणी सोडल्यास ते जमिनीत मुरेल आणि विहिरी व व कूपनलिकांद्वारे नागरिकांना उपलब्ध होईल. त्यामुळे आंबोली धरणातील कालव्यांची कामे व अस्तित्वात असलेल्या कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी शेकापचे तालुका चिटणीस व नगरसेवक मनोज भगत यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबोली येथील धरणातील कालव्यांची कामे रखडली आहेत. तसेच मुबलक पाणी असूनसुद्धा पाणी न सोडल्यामुळे या धरणातील आजूबाजूच्या गावात मोठ्या भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आंबोली धरण हे हेटवणे लघु पाटबंधारे विभाग रायगड याच्या अंतर्गत येते; परंतु या विभागाचे धरणाकडे दुर्लक्ष झाले असून या ठिकाणी अधिकारी वर्ग फिरकतच नाही, त्यामुळे लोकहिताचे निर्णयही घेता आलेले नाहीत. मुबलक पाणीसाठा असताना पाणी न सोडल्याने येथील विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चरणातील पाणी कालव्याद्वारे सोडल्यास, पाणी आंबोली ते तेलवडे व माझेरी, खोकरी भागापर्यंत उपलब्ध होण्यास मदत होईल. यासाठी लवकरच मुरु ड तहसीलदार यांची भेट घेणार असून धरणाचे पाणी सोडण्याची मागणी करणार असल्याचे नगरसेवक मनोज भगत यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी