शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पोलादपूरमधील देवळे धरणाला गळती, मुख्य साठ्यातून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:14 IST

पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणाला गळती लागली आहे. धरणातील मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी उत्सर्जन सुरू आहे तर पिचिंगमधूनही काही ठिकाणी गळती होत आहे.

- प्रकाश कदमपोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणाला गळती लागली आहे. धरणातील मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी उत्सर्जन सुरू आहे तर पिचिंगमधूनही काही ठिकाणी गळती होत आहे. चिपळूण येथील तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देवळे धरणक्षेत्रातील ग्रामस्थांवरही टांगती तलवार असून धरणाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.शासनाच्या जलसंधारण (लघु पाटबंधारे विभाग) विभागाकडून देवळे धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. १९८३ मध्ये धरणाच्या कामाला मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष काम सुरु व्हायला १९९७ साल उजाडले, तर २००३ मध्ये धरणाचे काम पूर्णत्वास गेले. धरणाच्या बांधकामासाठी आजवर ४ कोटी ३५ लाख २२ हजार रुपये निधी खर्च झाला. २९ शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने आपल्या पिकत्या जमिनी धरणासाठी दिल्या.गावात धरण झाले तर शेतीला बारमाही पाणी मिळेल गावात सुबत्ता येईल, गावकऱ्यांना नोकरी-व्यवसायासाठी मुंबई, पुणे, सुरत, बडोदा यासारख्या शहरात जावे लागणार नाही, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र धरणाचे काम पूर्ण होऊन जवळपास १५ वर्षे झाली आहेत. धरणाचा गावकºयांना काडीमात्र उपयोग झाला नाही.निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धरणाला पहिल्या वर्षीपासूनच मोठी गळती लागली. पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धरण पावसाळ्यानंतर कोरडे पडण्यास सुरवात होते. देवळे येथील स्थानिक पदाधिकारी अनिल दळवी, किसन रिंगे, लक्ष्मण मोरे, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्यासह आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली आणि गळतीचा आढावा घेतला. धरणाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धरणाच्या बांधावर झाडी वाढली असून मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात गळती आहेच, तसेच पिचिंगमधूनही गळती आहे. झाडांची मुळे खोलवर जाऊन धरणाला भेगा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धरण धोकादायक बनले आहे. धरणाची वेळीच दुरुस्ती न केल्यास दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे.अधिकाºयांकडून धरणाची पाहणीदेवळे धरणाला गळती लागल्याची माहिती मिळताच रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी तातडीने देवळे धरणाची पाहणी करण्याची सूचना प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आल्या. त्यानुसार पोलादपूर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे,अव्वल कारकून सुसलादे, तलाठी खेडकर यांनी प्रत्यक्षात जाऊन धरणाची पाहणी केली. त्यांनी मुख्य विमोचकाची पाहणी करून पाणीगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मान्य केले, तसेच पिचिंगमधून चार ते पाच ठिकाणी पाणीगळती होत असल्याची पाहणी केली.पंचायत समितीचे उपसभापती शैलेश सलागरे, लघुसिंचन पाटबंधारे विभाग माणगाव प्रभारी अधिकारी शेखर वडाळकर यांनीही अधिकाºयांसह देवळे धरणाला प्रत्यक्षात भेट दिली. यावेळी २०१३ रोजी धरणाच्या दुरुस्तीसंदर्भात पाठवलेला अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली असली तरी निधी उपलब्ध नसल्याने काम सुरू झालेले नाही. मुख्य विमोचकातून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर आमदार भरतशेठ गोगावले यांनीही देवळे धरणाची पाहणी केली. लघुपाटबंधारे विभागाला दुरुस्तीसाठी सुधारित अंदाजपत्रक बनवून जलसंधारण मंत्री तानाजी सावंत त्यांच्याकडे बैठक बोलावून चर्चा करणार असल्याचे सांगितले.देवळे धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे त्याचा उपयोग शेतकºयांना, गावकºयांना होत नाही. तिवरे येथे घडलेल्या घटनेमुळे देवळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी धरणाची दुरुस्ती करा, अन्यथा धरण नष्ट करण्याची मागणी केलेली आहे. त्याचा पाठपुरावा जलसंधारण मंत्री यांच्याकडे करणार आहोत.- भरत गोगावले, आमदार, महाडसातत्याने पाठपुरावा करूनही लघुपाटबंधारे विभागाने धरणाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. जलसंधारण विभागातील उपविभागीय कार्यालयाकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.- चंद्रकांत कळंबे, माजी उपाध्यक्ष तथा राजिप सदस्यदेवळे धरण होऊन जवळपास १५ वर्षे झाली असून आम्हा ग्रामस्थांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही. कारण धरणाला गळती लागली आहे. याबाबत शासनाकडे दुरुस्तीची मागणी केली आहे. तिवरे धरण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी- बबिता दळवी, सरपंच,देवळे ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड