शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:20 IST

अस्मानी संकटाने हैराण :आम्ही आता नक्की करायचे तरी काय? शेतकऱ्यांचा करुण प्रश्न

नागोठणे : विभागातील वरवठणे येथील गोकुळ पाटील यांची स्वत:ची ४७ गुंठे जमीन असून पत्नीच्या नावे दुसरी ५५ गुंठे जमीन आहे. दोन्ही शेतांत भाताचे पीक घेतले जाते. पडलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले जवळपास ९० टक्के पीक नष्ट झाले असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. भाताची लागवड करण्यापासून लावणी कापणीसाठी या दोन्ही शेतांसाठी ३० ते ३२ हजार रुपयांचा खर्च आम्हाला येत असतो. ही कामे करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा सुद्धा हातभार लागत असल्याने सर्व कामांसाठी १०० टक्के मजूर घेतले, तर हाच खर्च काही हजारांनी वाढू शकतो असे त्यांनी सांगितले.

सर्वजण मदत करत असल्याने दरवर्षी दहा ते बारा खंडी भात आमच्या हातात येत असतो. मात्र, पावसाने यावर्षी फक्त दहा टक्के पीक हातात आले असले तरी, तांदूळ पांढºया ऐवजी पिवळ्या रंगाचा होणार असून ते खाण्या योग्य सुध्दा राहणार नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. घरात खाण्यासाठी भात काढून ठेवल्यावर उर्वरित भात दरवर्षी विकून टाकत असतो. व्यापारी बाराशे रुपये क्विंटल दराने भात खरेदी करतात. तर, सोसायटीचे तो विकत घेतला, तर हाच भाव सतराशे रुपये दराने मिळत असतो. या वर्षी भात हातातच येत नसल्याची भीती व्यक्त करताना शेतकºयांनी आता कोणावर भरोसा ठेवायचा, असे त्यांनी उद्विग्नपणे सांगितले. सरकारी अधिकाºयांनी शेतीची पाहणी केली आहे. गतवर्षी झालेल्या शेतीच्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नाही अथवा बँकेत सुध्दा पैसे जमा झालेले नाहीत. कृषी खात्याकडून लवकरच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असे सांगितले जात असले तरी, ते फक्त आश्वासनच राहिले असल्याचे गोकुळ पाटील यांनी सांगितले.सुरुवातीला हंगामातील पावसाने पिकाचे नुकसान झाले, त्यातून आम्ही सावरलो... पुन्हा पोटाला चिमटा काढत काम केलं... जोमदार पीक शिवारात डोलताना पाहून बरं वाटलं...मात्र निसर्गानेच आमचा घात के ला...तयार झालेले भाताचे पीक, मागील आठवड्यात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने आमच्या तोंडातून काढून घेतले... या अस्मानी संकटाने वर्षभराची आमची मेहनत वाया गेली... आता खायचे काय?... गुरांच्या पेंढ्याचेही नुकसान झाले... गुरांसाठी कु ठून खाद्य आणायचे?...आम्ही आता नक्की करायचे तरी काय, असा सवाल वरवठणे येथील एक शेतकरी गोकुळ पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊसFarmerशेतकरी