शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टाटाने केले बाय बाय अन् उधाणाने शहापूरकर बेहाल; कंपनीने आश्वासन पाळले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 06:32 IST

खार बंदिस्ती नसल्याने तीन दिवसांपासून शेतांमध्ये पूरस्थिती

अलिबाग - टाटा विद्युत प्रकल्पासाठी शहापूर, मोठे शहापूर, धेरंड गावात शेतकऱ्यांनी एमआयडीसीमार्फत जमीन दिली होती. मात्र, १३ वर्षांनंतरही ना प्रकल्प झाला ना शेतकऱ्यांना लाभ मिळाला. खार बंदिस्ती नसल्याने गेले तीन दिवस उधाण येऊन खाडीतील पाणी येथील ग्रामस्थांच्या घरात घुसत आहे. त्यामुळे शहापूर, धेरंड ग्रामस्थांच्या घरांसह शेतीचेही नुकसान होत आहे. 

स्थानिकांच्या या समस्येकडे एमआयडीसी तसेच प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे  प्रकल्पाला जमिनी देऊन डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. येथील शेकडो एकर शेतजमीन टाटा विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी १३ वर्षांपूर्वी दिली होती. नव्या प्रकल्पामुळे या भागाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, अशी आशा होती. एमआयडीसीमार्फत जमीन भूसंपादित करण्यात आली. टाटा वीज प्रकल्पाच्या प्रशासनानेही गावाच्या परिसरात असलेली शेतीची खार बंदिस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कंपनीने आश्वासन तर पाळले नाहीच उलट प्रकल्पही गुंडाळला. 

खाडीमधील उधाणापासून शेतीचा बचाव व्हावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी स्वखर्चाने बांधबंदिस्ती करत होते. खासगी प्रकल्पाला जमीन दिल्याने खारभूमी विभागही खार बंदिस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. अंधेरी येथील एमआयडीसी कार्यालयात अनेकवेळा गाव कमिटीने जाऊन समस्या मांडली. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. प्रशासनही ग्रामस्थांची समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. 

स्थानिकांची नुकसानभरपाईची मागणी सोमवारपासून मोठे उधाण असल्याने आणि गावाची खार बंदिस्ती नसल्याने पाणी घरात, शेततळी, शेतात घुसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून स्थानिक हा त्रास सहन करत आहेत. शेततळ्यात खारे पाणी घुसल्याने तळ्यातील मासेही उधाणात गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सामानाचे नुकसान झाले आहे. धेरंड गावात ३२०, मोठा शहापूर येथे ४७० तर धाकटी शहापूरला ३७५ घरे आहेत. ८० टक्के घरांमध्ये पाणी घुसले आहे.