शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

टाटाने केले बाय बाय अन् उधाणाने शहापूरकर बेहाल; कंपनीने आश्वासन पाळले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 06:32 IST

खार बंदिस्ती नसल्याने तीन दिवसांपासून शेतांमध्ये पूरस्थिती

अलिबाग - टाटा विद्युत प्रकल्पासाठी शहापूर, मोठे शहापूर, धेरंड गावात शेतकऱ्यांनी एमआयडीसीमार्फत जमीन दिली होती. मात्र, १३ वर्षांनंतरही ना प्रकल्प झाला ना शेतकऱ्यांना लाभ मिळाला. खार बंदिस्ती नसल्याने गेले तीन दिवस उधाण येऊन खाडीतील पाणी येथील ग्रामस्थांच्या घरात घुसत आहे. त्यामुळे शहापूर, धेरंड ग्रामस्थांच्या घरांसह शेतीचेही नुकसान होत आहे. 

स्थानिकांच्या या समस्येकडे एमआयडीसी तसेच प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे  प्रकल्पाला जमिनी देऊन डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. येथील शेकडो एकर शेतजमीन टाटा विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी १३ वर्षांपूर्वी दिली होती. नव्या प्रकल्पामुळे या भागाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, अशी आशा होती. एमआयडीसीमार्फत जमीन भूसंपादित करण्यात आली. टाटा वीज प्रकल्पाच्या प्रशासनानेही गावाच्या परिसरात असलेली शेतीची खार बंदिस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कंपनीने आश्वासन तर पाळले नाहीच उलट प्रकल्पही गुंडाळला. 

खाडीमधील उधाणापासून शेतीचा बचाव व्हावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी स्वखर्चाने बांधबंदिस्ती करत होते. खासगी प्रकल्पाला जमीन दिल्याने खारभूमी विभागही खार बंदिस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. अंधेरी येथील एमआयडीसी कार्यालयात अनेकवेळा गाव कमिटीने जाऊन समस्या मांडली. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. प्रशासनही ग्रामस्थांची समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. 

स्थानिकांची नुकसानभरपाईची मागणी सोमवारपासून मोठे उधाण असल्याने आणि गावाची खार बंदिस्ती नसल्याने पाणी घरात, शेततळी, शेतात घुसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून स्थानिक हा त्रास सहन करत आहेत. शेततळ्यात खारे पाणी घुसल्याने तळ्यातील मासेही उधाणात गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सामानाचे नुकसान झाले आहे. धेरंड गावात ३२०, मोठा शहापूर येथे ४७० तर धाकटी शहापूरला ३७५ घरे आहेत. ८० टक्के घरांमध्ये पाणी घुसले आहे.