शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रायगडवर पाणीटंचाईचे संकट; जिल्ह्यातील ११९ गावे, वाड्यांना झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 01:39 IST

पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यात समस्या

- निखिल म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अनेक भागांत आता पाणीटंचाईचेही सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ११९ गावे आणि वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या वर्षी साडेचार हजार मिलिमीटर पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस झाल्याने यंदा रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पेण, रोहा, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील अनेक गावांत पाणी समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.पेण तालुक्यात ९ गावे, ६१ वाड्या, रोहा तालुक्यात ४ गावे, २ वाड्या, महाड तालुक्यात १ गाव २ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यात १३ गाव, २७ वाड्या अशा ११९ गाव-वाड्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन आता १२ टँकर्सच्या मदतीने या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. गरज असेल तेथे विंधन विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाणी योजनांची कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पोलादपूरमधील ४० गावांना चार टँकरने पाणीपोलादपूर : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे पाणीटंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या या दुहेरी संकटाचा सामना सध्या ठिकठिकाणी करावा लागत आहे. पोलादपूर तालुक्यातील १३ गावे २७ वाड्यांसाठी तालुक्यातील तीन टँकर मालकांच्या चार टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश टंचाई निवारण आराखड्यात करण्यात आला होता. यापैकी सद्य:स्थितीत १३ गावे २७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टंचाईग्रस्त ४0 गाव-वाड्यांमध्ये केवनाळे, चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, दाभिळ, सडेकोंड, सडे, बोरघर, वाकण, नानेघोळ या गावांसह केवनाळे आंबेमाची, बोरघर बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, वडघर - दिवाळवाडी, सनसपेढा, पवारवाडी, उलालवाडी, सणसवाडी, फौजदारवाडी तर कामथे येथील जांभडी, फौजदारवाडी, शेंबिवाडी, आदिवासीवाडी, देऊळवाडी किनेश्वर, मोरसाडे गावातील वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.कोणीही पाण्यावाचून राहणार नाही - कांबळेपोलादपूर तालुक्यातील १३ गावे २७ वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर १ गाव, ८ वाड्यांसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे, तो प्रलंबित आहे. २१ एप्रिल रोजी ६ गावे व ४ वाड्यांचे मागणी अर्ज पंचायत समिती येथे प्राप्त झाले आहेत. हे अर्ज लवकर जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतील, अशी माहिती पोलादपूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे जी.ई. कांबळे यांनी दिली आहे. कोणतीही गाव-वाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी महसूल तालुका प्रशासन व पंचायत समिती प्रशासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई