शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

पनवेलमध्ये लाखो लीटर पाणी वाया

By admin | Updated: November 18, 2016 04:09 IST

नवीन पनवेलमधील पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने येथील झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

पनवेल : नवीन पनवेलमधील पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने येथील झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. लाखो लीटर पाणी वाहून गेल्याने दिवसभर पनवेलच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. अनेकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे भिजल्याने गुरुवारी रात्रीच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. गुरुवारी पनवेल शहरात सायंकाळी पाणीपुरवठाही होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे आता शुक्र वारी सकाळी पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरु वारी सकाळी ११.३० च्या दरम्यान नवीन पनवेलमधील रेल्वे रुळाजवळ असलेल्या पंचशीलनगरच्या बाजूला असलेली पाइपलाइन फुटली. पाण्याचा वेग इतका होता की, बाबू पवार यांच्या झोपडीची भिंत फोडून पाणी आत शिरले. त्यानंतर काही समजायच्या आत संपूर्ण वसाहतीत पाणीच पाणी झाले. झोपडपट्टीतील अनेकांचे संसार पाण्यात गेले. घरातील अन्नधान्य, कपडे, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भिजल्या. काही घरांमध्ये केवळ लहान मुले अथवा ज्येष्ठ व्यक्तीच असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हरिश्चंद्र बनकर यांच्या घरात यावेळी त्यांची ८० वर्षांची आई होती. घरात १ फुटापेक्षा जास्त पाणी शिरल्याने सर्वच सामान पाण्याखाली गेले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ही जलवाहिनी २५-३० वर्षे जुनी आहे. गुरुवारी सेक्टर ४ मधील दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतले होते. दोन ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते. अचानक पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने शटडाऊनचे काम थांबवण्यात आले आणि एमजेपीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पंचशीलनगरमध्ये धाव घेतली. जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. जलवाहिनीचे काम उशिरापर्यंत करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न जीवन प्राधिकरणातर्फे केला जात आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे उप अभियंता एस.डी. दशोरे यांनी सांगितले. (वार्ताहर)