शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

वाकण - खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:47 PM

प्रवासी समाधानी : कोकणात येणाऱ्यांचा प्रवास सुखकर

पाली : वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे गणपती सणासाठी गावाला येणाºया चाकरमानी प्रवासी व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून एमएसआरडीसीकडून पाली-खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

वाकण -पाली -खोपोली महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: दुर्दशा झाली आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट होते, या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाºया वाहनचालक, नोकरदार, प्रवाशांना पाठ, कंबर, मणक्याचे आजार आदी दुखण्याने ग्रासले आहे. या सर्व परिस्थितीकडे एमएसआरडीसीचे वारंवार लक्ष वेधूनही खड्ड्यात हरवलेल्या वाकण-पाली - खोपोली महामार्ग सुस्थितीत आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नव्हते. अखेर गणपती सणानिमित्ताने एमएसआरडीसीकडून मागील तीन चार दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.

वाकण -पाली -खोपोली महामार्गाचे सर्व खड्डे गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी बुजविले जाणार आहेत. या महामार्गावर आजही अवजड वाहनांची सतत वाहतूक व मुसळधार पाऊस यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते; आता खड्डे भरण्यासाठी खडी, दगड, डांबर वापरून बुजविण्यात येत आहेत.वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्यात येत असल्याने वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाने उघडीप दिल्यास या मार्गावरील सर्व खड्डे डांबर मिक्स खडीने भरून महामार्गावरून गणपतीसाठी कोकणात येणाºया चाकरमानी प्रवाशांसाठी खड्डेमुक्त करण्यात येईल.- आर.एस. फुले,व्यवस्थापकीय अभियंता, एमएसआरडीसी