शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये पर्यटक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 03:36 IST

दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालयांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत.

अलिबाग - दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालयांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणचे हॉटेल्स, रेस्टारंट, कॉटेजेसही चांगलीच फुलून गेल्याचे दिसून येते. पावसाच्या मोसमात थंडावलेल्या पर्यटन व्यवसायाला त्यानिमित्ताने पुन्हा लकाकी आल्याचे पर्यटकांच्या संख्येवरून अधोरेखित होते.रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनाचा जिल्हा अशी झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल होत असतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन, माथेरान या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. धार्मिक, ऐतिहासिक, समुद्र पर्यटन असे विविध पर्याय पर्यटकांसाठी खुले असणे आणि मुंबई, पुण्यापासून जवळ असल्यामुळे तसेच वाहतुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने जिल्ह्यात पर्यटकांचा तसा वर्षभर राबता असतो. पावसाच्या हंगामामध्ये फारसे पर्यटक या ठिकाणी फिरकत नाहीत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय म्हणावा तसा जोर धरत नाही. त्यामुळे त्यांचे अर्थव्यस्थेचे गणित काही प्रमाणात कोलमडून पडते. पावसाळ्यामध्ये वर्षासहलीचा बेत आखलेला असतो. मात्र, यंदाच्या पावासाळी हंगामात रस्त्यांची पुन्हा एकदा दैना उडाल्याने पर्यटकांनी या ठिकाणी येण्याचे टाळले होते. आता पावसाळा संपल्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीची काही प्रमाणात कामे झाली आहेत, तर काही कामे प्रस्तावित आहेत.पावसाळा संपल्यावर दिवाळी सुट्ट्यांचा हंगाम हा पर्यटन व्यवसायाचा पहिला आणि तितकाच महत्त्वाचा हंगाम आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, मांडवा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच माथेरान या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांनी पसंती दिल्याने या ठिकाणी त्यांचा राबता दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की लगेच शाळा, महाविद्यालय यांच्या सहली मोठ्या संख्येने दाखल होतात.अलिबाग हे मुंबई पुण्यापासून जवळ असणारे शहर आहे. मुंबईमधील पर्यटकांना येथे पोहोचण्यासाठी सागरीमार्ग हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे रस्त्यावरील चार तासांचा प्रवास टाळून पर्यटक बोटीनेच येथे येण्याला सर्वाधिक पसंती देतात. अलिबागहून पुढे काशिद, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात पोहोचता येत असल्याने अलिबागचे पर्यटन आटोपून पर्यटक पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज होतात. समुद्रकिनारे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. हे चित्र पुढचा आठवडाभर असणार आहे.पर्यटनाला फायदातालुक्यात शुक्रवारनंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाच्या हंगामातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्यांची वाट बघत बसावे लागते. आता सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला फायदा होणार असल्याचे येथील एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रtourismपर्यटन