शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विक्रमगडमध्ये 400 कुटुंबांवर आली अंधारात राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:30 IST

वीजजोडणीची प्रतीक्षा : वीज मीटरच्या तुटवड्याचे महावितरणचे कारण

- राहुल वाडेकरलोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : राज्यभरात अनेकांना हजारोंची वीजबिले आलेली आहेत. तर दुसरीकडे विक्रमगड तालुक्यातील शेकडो नागरिक वीजजोडणी मिळावी या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील ४०० नागरिकांनी वीजजोडणीसाठी अर्ज केले आहेत. अर्जासोबत आगाऊ रक्कमही भरली  आहे, परंतु अनेक महिने उलटून गेल्यानंतरही यांना वीजजोडणी दिलेली नसल्याने साधारणपणे ४०० पेक्षा जास्त कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तर वीजमीटरच्या तुटवड्यामुळे वीजजोडण्यांना विलंब होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुक्याच्या ठिकाणीही आज प्रत्येक घरात टीव्ही, फ्रीज, फॅन अशा विजेवर चालणाऱ्या वस्तू आहेत, परंतु अद्यापही या घरात वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे घरात असणारी ही उपकरणे धूळखात पडली आहेत. नागरिकांना मोबाइल चार्ज करण्यासाठीही ज्यांच्या घरी वीजजोडणी आहे अशा शेजारच्यांची मदत घ्यावी लागते. एकीकडे घरगुती वस्तू ते अगदी विजेवर चालणारी वाहनेही बाजारात आली आहेत. मात्र दुसरीकडे विक्रमगडसारख्या आदिवासी ग्रामीण भागात वीज मीटर मिळवण्यासाठी नागरिकांना महावितरणचे उंबरे झिजवावे लागत आहेत. दररोज महावितरणकडे वीजजोडणीसाठी नवीन अर्ज येत आहेत. परंतु त्यांना जोडणी मिळत नाही. त्यामुळे शेकडो कुटुंबांना विनाकारण त्रास तर होतोच, पण त्या घरातील विद्यार्थी, नोकरदारांचे या कोरोनाच्या काळात नुकसानही झाले आहे.

 आम्ही वीजजोडणीसाठी पैसे भरले आहेत. तीन महिने झाले तरी अजून वीज मीटर मिळालेले नाही. आम्ही बऱ्याचदा महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या मारून विनंती केली. लवकरच मीटर येतील असे सांगितले जात आहे. - भूषण महाले, नागरिक

नागरिकांच्या मागणीनुसार वीजजोडण्या चालू आहेत. परंतु मीटरचा तुटवडा असल्याने वीजजोडणी देताना अडचणी येत आहेत. तरी मार्च अखेरपर्यंत सर्व अर्जदारांना  वीजजोडणी देण्यात येईल. - महेश नागो, कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, विक्रमगड