शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

चौपदरीकरणात विहीर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:02 AM

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हळूहळू वेग धरत आहे. इंदापूर ते पोलादपूर दरम्यान सर्वच गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात कामास प्रारंभ झाला आहे

सिकंदर अनवारे दासगाव : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हळूहळू वेग धरत आहे. इंदापूर ते पोलादपूर दरम्यान सर्वच गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात कामास प्रारंभ झाला आहे. देऊळ, मशिद, शाळा यासारख्या सार्वजनिक सुविधा बाधित होत असतानाच दासगाव गावातील बारमाही पुरवठा करणारी विहीर चौपदरीकरणाच्या कामात बाधित होणार आहे. आज या विहिरीच्या बाधित होण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. ही विहीर बाधित होत असताना त्याचा फटका दासगावच्या दरडग्रस्त राहत असलेल्या पत्रा शेडला बसणार आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. जमीन मालक शेतकºयांची देणी बºयाच प्रमाणात पूर्ण झाली असून ठेकेदार कंपनीने चौपदरीकरणाच्या कामासाठी जागांचा ताबा घेतला आहे. पोकलेन जेसीबीच्या माध्यमातून खड्डे मारून चौपदरीकरणाची हद्द निश्चित करणे, पाइपच्या मोºया टाकणे, पाणीपुरवठा योजनांची कामे आदी कामांना प्रारंभ झाला आहे. शासकीय आदेशानुसार चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दूरध्वनी व्यवस्था आणि पाणीपुरवठा या अत्यावश्यक बाबी खंडित होणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यायची आहे. राष्टÑीय महामार्ग विभाग, ठेकेदार कंपनी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या माध्यमातून ही काम केली जात असताना दासगावमधील आपद्ग्रस्तांच्या नवीन वसाहतीला पाणीपुरवठा करणारी एक विहीर दुर्लक्षित झाली आहे.महाड तालुक्यातील दासगाव हे महत्त्वपूर्ण गाव असून शिवकाळाआधीपासून बंदर म्हणून दासगावची इतिहासात नोंद आहे. २००५ मध्ये महापूर आल्यानंतर कोसळलेल्या दरडीनंतर दासगाव पुन्हा एकदा जगाच्या पटलावर आले. याच दरडग्रस्तांसाठी दासगावच्या हद्दीमध्ये मुंबई - गोवा महामार्गालगत पत्राशेड बांधून वसाहत तयार करण्यात आली आहे. या वसाहतीला वर्षातून चार ते पाच महिने महामार्गालगत शेडपासून जवळच असलेल्या विहिरीवर अवलंबून राहावे लागते. ही विहीर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात बाधित होत असल्याने दासगाव आपद्ग्रस्तांच्या पत्रा शेड या वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.पत्रा शेडजवळ आणि महामार्गालगत असलेल्या या विहिरीला वर्षाचे १२ महिने पिण्याचे योग्य पाणी आहे. दासगावमध्ये कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळा सुरू झाला की क ोतुर्डे धरणाची पाण्याची पातळी खाली जाते. यामुळे दासगावसह ७ गावांना या पाणीपुरवठा योजनेमार्फत होणारा पाणीपुरवठा खंडित होतो.यावेळी प्रत्येक गावात असणाºया उपलब्ध पाणी स्रोतावर ग्रामस्थांची भिस्त असते. पत्रा शेड या टंचाईच्या काळात याच महामार्गालगत असलेल्या विहिरींवर पूर्णपणे अवलंबून असते.चौपदरीकरणाच्या कामात आता ही विहीर बाधित होत असल्याने पत्रा शेड ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विहिरीकडे दुर्लक्ष१दासगाव गाव हद्दीतील पत्रा शेडशेजारी महामार्गालगत असलेली ही विहीर सद्यस्थितीत महामार्गाला लागून असल्याने भविष्यात होणाºया चौपदरीकरणात मध्यभागी ही विहीर येणार आहे.२ही विहीर वाचवता येणे शक्य नाही. मात्र ही विहीर बाधित होत असताना या विहिरीवर पाण्यासाठी अवलंबून असणाºया ग्रामस्थांचा विचार केला गेलेला नाही.३दासगाव गाव हद्दीत चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. काम करीत असताना ठेकेदार कंपनीने विहिर नष्ट के लीतर आपद्ग्रस्तांच्या पत्रा शेडला वहूर गाव हद्दीतून अगर दासगाव गावातून १ किमी अंतरावरून पाणी आणल्याशिवाय पर्याय राहणार नाही.४दासगाव आपद्ग्रस्त पत्रा शेडला स्वत:चा असा पाण्याचा उद्भव नाही. शासनाने त्यांना जमिनी देखील हस्तांतरित केल्या आहेत. टंचाई सुरू झाल्यानंतर सुमारे १ ते २ किमी दूरहून पाणी आणल्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय राहणार नाही. पाण्यासाठी ही वणवण चौपदरीकरणाचे काम सुरू असताना करावी लागणार असल्याने या ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे.