शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

महामार्गावर वाहनांची वर्दळ

By admin | Updated: September 16, 2015 23:58 IST

गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

पनवेल : गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी यावेळी वाहतूक पोलिसांची असते. त्यादृष्टीने महामार्गावर विविध उपाययोजना राबविण्यात आल्या असून तब्बल ३५० वाहतूक पोलीस व २० ते २५ अधिकाऱ्यांंना बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. मुंबईमधून सर्वात जास्त वाहने कोकणाकडे रवाना होतात. सायन पनवेल महामार्गाचे रुंदीकरण यावर्षी पूर्ण झाले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. मात्र खारघर टोल नाक्यावर कामोठे टोल प्लाझावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मंगळवारी संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी अगदी खारघर टोल नाक्यापर्यंत पोहचली होती. बुधवारी संध्याकाळीदेखील परिस्थिती जैसे थेच असल्याचे पहावयास मिळाले. पनवेल शहरातून गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. ही प्रवेशबंदी विर्सजनापर्यंत कायम राहणार आहे. कळंबोली सर्कलपासून ट्रक, टूरीस्ट वाहने, एसटी, टे्रलर, ट्रक, टेम्पो आदी वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जी पर्यंत वळविण्यात आली आहेत. तक्का, पळस्पे फाटा तसेच पनवेल शहराबाहेरील अरुंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पाच लाखापेक्षा जास्त चाकरमानी खाजगी अथवा एसटी महामंडळाच्या वाहनांनी रवाना झाले.यावर्षी ४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कोकणवासीयांसाठी पनवेल ते चिपळूण ही १२ डब्यांची विशेष टे्रन सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या वर्गासाठी एक डबा व एक महिला वर्गासाठी डबा ठेवण्यात आला आहे. या टे्रनमध्ये जाण्यासाठी देखील प्रवाशांची मोठी गर्दी पनवेल रेल्वे स्थानकावर होती.मागील तीन दिवसापासून या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे बुधवारी दिसून आले. तसेच खारघर हिरानंदानी बस थांबा, कळंबोली, पनवेल याठिकाणच्या बसस्थानकावर देखील प्रवासी मोठ्या संख्येने थांबल्याचे दिसून येत आहेत. गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यामुळे पुढच्या दहा दिवसापर्यंत दोन्ही महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरु राहणार आहे. लाखो वाहने मुंबई गोवा महामार्गावरुन कोकणाकडे रवाना झाली आहेत. खारपाडा टोलनाक्यावर या वाहनांची गणना केली जात होती. मात्र या वर्षी खारपाडा टोल नाका बंद झाल्याने वाहनांची निश्चित आकडेवारी वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे समजले. (वार्ताहर)कोकणाकडे जाताना वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणाकडे रवाना होत असतात यामध्ये खाजगी गाड्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यातच अरुंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते म्हणून वाहन चालकांनी याबाबत योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. याकरिता महामार्गावर तब्बल ३५० वाहतूक कर्मचारी व २० ते २२ अधिकारी महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. - अरविंद साळवे, वाहतूक पोलीस उपायुक्त