शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

पाणीटंचाईमुळे भाजीपाल्यांचे दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले, विवाह खर्च वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 07:03 IST

रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे

- प्रदीप मोकलवडखळ  - रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; परंतु पेण, वडखळ बाजारासह गावोगावच्या आठवडा बाजारात भाजीपाल्याची आवक कमी व मागणी जास्त असल्याने भाव वाढले आहेत, यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे तर लग्न समारंभाच्या खर्चात वाढ झाली आहे.सध्या बाजारात वांगी ७० रुपये किलो, भेंडी ६० रुपये किलो, टोमॅटो ५० रुपये किलो, मटार ८० रुपये किलो, मिरची ७० रुपये किलो, गवार ५० रुपये किलो, फरसबी ६० रुपये किलो, कोथिंबीर जुडी ५० रुपये, मेथी जुडी २५ ते ३० रुपये तर फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. विहिरी कूपनलिकांची पाण्याची पातळी कमालीची खालावली असून नवीन कूपनलिका खोदताना सुमारे ३०० फुटांपर्यंत पाणी लागत नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील स्थानिक भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे.पेण, वडखळ बाजारात पुणे, चाकण येथून भाजीपाला विक्रीस येत आहे; परंतु तेथून येणाºया भाजीपाल्याची आवकही मंदावली असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.- विक्रांत पाटील, भाजी विक्रेताबाजारात भाज्याचे दर वाढले असल्याने महिन्याचा खर्च तर वाढलाच आहे तर लग्न समारंभाच्या खर्चात वाढ झाली आहे.- देवेंद्र पाटील, ग्राहक

टॅग्स :vegetableभाज्याwater scarcityपाणी टंचाईInflationमहागाई