शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ लाख ६५ हजार जनावरांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 05:30 IST

पशुधन वाचविण्याचा प्रयत्न : जिल्हा पशुसंवर्धन विभागाची मोहीम

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पशुधनात घट होत आहे. कृषी क्षेत्रावर आधारित व्यवसायांवर याचा विपरीत परिणाम होत आहे तर दुसरीकडे विविध आजारांची लागण होत असल्याने जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यावर वेळीच उपाययोजना करून पशुधन वाचवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने तब्बल एक लाख ६५ हजार १९१ जनावरांचे लसीकरण केले आहे.

पावसाळ्यात गाय, म्हैस, बैल व शेळ्या, मेंढ्या अशा अनेक पाळीव प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याची भीती असते. आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून या जनावरांचे लसीकरण करण्यात आले. एकूण एक लाख ६५ हजार १९१ जनावरांचे लसीकरण केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश लाळगे यांनी दिली. पावसाळ्यात पाळीव जनावरांना घटसर्प, फेऱ्या, आत्र विषारी, लाळ खुरकूत असे रोग निर्माण होतात. त्यात घटसर्प हा जनावरांना, प्राण्यांना, तसेच दुधाळ जनावरांना होणारा रोग आहे. विशेषत: म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. हा रोग ‘पाश्चुरेला मल्टोसिडा’ या विषाणूंमुळे होतो. या रोगाचे जंतू जमिनीत, जनावराच्या नाकपुड्यात व श्वासनलिकेत असतात.रोगी जनावराच्या नाकातोंडातून वाहणाºया स्त्रावामुळे व दूषित चाºयाद्वारे हा रोग पसरतो. या रोगामुळे जनावरांना ताप येतो. घशास सूज येते. श्वासोच्छवास जलद रीतीने होतो. जनावराचे डोळे लाल होतात. ते सतत वाहतात. जीभ बाहेर येते. काही वेळेस जनावरांना रक्ताची हागवण होते व अंगावर सूज येते.लाळ अथवा खुरकूत हा रोग लहान-मोठ्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढरे यांना होतो. यात ताप, लाळ गळणे, तोंडात व जिभेवर चट्टे पडणे; शिंगे व खूर गरम होणे व पायांच्या दोन्ही नख्यांमधील जागेत फोड येऊन फुटणे व जनावर लंगडणे वगैरे रोग होतात. या रोगात जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते. फेºया हा रोग वयाने लहान व सशक्त अशा गुरांना होतो. हा रोग फार घातक असून या रोगाने पछाडलेले जनावर एक दोन दिवसांत मरते. यात ताप येतो, जनावर सुस्त होते. आत्र विषारी हा रोग शेळ्या, मेंंढ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. आत्र विषारी आजारामुळे जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. रायगड जिल्ह्यातील गाय, म्हैस, रेडा, बैल, शेळ्या, मेंढ्यांना अशा प्रकारचे रोग होऊ नये, तसेच या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी जनावरांंचे लसीकरण करण्यात आले.रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे तीन लाख गाय, बैल आणि म्हशींची संख्या आहे. सर्वच शेतकरी जनावरांना लसीकरणासाठी नेत नाहीत. त्यांच्यावर जबरदस्तीही करू शकत नाही. पशुवैद्यकीय अधिकारी गावागावात भेट देत असून अधिकाधिक शेतकºयांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.- डॉ. राजेश लाळगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

टॅग्स :Raigadरायगडcowगाय