शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

जिल्ह्यात १ लाख ६५ हजार जनावरांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 05:30 IST

पशुधन वाचविण्याचा प्रयत्न : जिल्हा पशुसंवर्धन विभागाची मोहीम

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पशुधनात घट होत आहे. कृषी क्षेत्रावर आधारित व्यवसायांवर याचा विपरीत परिणाम होत आहे तर दुसरीकडे विविध आजारांची लागण होत असल्याने जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यावर वेळीच उपाययोजना करून पशुधन वाचवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने तब्बल एक लाख ६५ हजार १९१ जनावरांचे लसीकरण केले आहे.

पावसाळ्यात गाय, म्हैस, बैल व शेळ्या, मेंढ्या अशा अनेक पाळीव प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याची भीती असते. आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून या जनावरांचे लसीकरण करण्यात आले. एकूण एक लाख ६५ हजार १९१ जनावरांचे लसीकरण केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश लाळगे यांनी दिली. पावसाळ्यात पाळीव जनावरांना घटसर्प, फेऱ्या, आत्र विषारी, लाळ खुरकूत असे रोग निर्माण होतात. त्यात घटसर्प हा जनावरांना, प्राण्यांना, तसेच दुधाळ जनावरांना होणारा रोग आहे. विशेषत: म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. हा रोग ‘पाश्चुरेला मल्टोसिडा’ या विषाणूंमुळे होतो. या रोगाचे जंतू जमिनीत, जनावराच्या नाकपुड्यात व श्वासनलिकेत असतात.रोगी जनावराच्या नाकातोंडातून वाहणाºया स्त्रावामुळे व दूषित चाºयाद्वारे हा रोग पसरतो. या रोगामुळे जनावरांना ताप येतो. घशास सूज येते. श्वासोच्छवास जलद रीतीने होतो. जनावराचे डोळे लाल होतात. ते सतत वाहतात. जीभ बाहेर येते. काही वेळेस जनावरांना रक्ताची हागवण होते व अंगावर सूज येते.लाळ अथवा खुरकूत हा रोग लहान-मोठ्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढरे यांना होतो. यात ताप, लाळ गळणे, तोंडात व जिभेवर चट्टे पडणे; शिंगे व खूर गरम होणे व पायांच्या दोन्ही नख्यांमधील जागेत फोड येऊन फुटणे व जनावर लंगडणे वगैरे रोग होतात. या रोगात जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते. फेºया हा रोग वयाने लहान व सशक्त अशा गुरांना होतो. हा रोग फार घातक असून या रोगाने पछाडलेले जनावर एक दोन दिवसांत मरते. यात ताप येतो, जनावर सुस्त होते. आत्र विषारी हा रोग शेळ्या, मेंंढ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. आत्र विषारी आजारामुळे जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. रायगड जिल्ह्यातील गाय, म्हैस, रेडा, बैल, शेळ्या, मेंढ्यांना अशा प्रकारचे रोग होऊ नये, तसेच या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी जनावरांंचे लसीकरण करण्यात आले.रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे तीन लाख गाय, बैल आणि म्हशींची संख्या आहे. सर्वच शेतकरी जनावरांना लसीकरणासाठी नेत नाहीत. त्यांच्यावर जबरदस्तीही करू शकत नाही. पशुवैद्यकीय अधिकारी गावागावात भेट देत असून अधिकाधिक शेतकºयांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.- डॉ. राजेश लाळगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

टॅग्स :Raigadरायगडcowगाय