शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात, कडधान्य, आंबापीक धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 02:32 IST

Rain In Raigad : शुक्रवारी अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण महाड तालुक्यात हलक्या स्वरूपात पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे.

दासगाव : शुक्रवारी अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण महाड तालुक्यात हलक्या स्वरूपात पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. या पावसाचा फटका कडधान्य आणि आंबा पिकाला बसणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भातपीक नष्ट झाले, शेतकरी फार खचून गेला असताना, कडधान्याचे कोठार समजले जाणाऱ्या महाड तालुक्यामध्ये परतीच्या पावसाचे पाणी शेतामध्ये साचून राहिले होते. त्यामुळे कडधान्य मूग, मटकी, पावटा, वाल, हरभरा याची पेरणी उशिरा झाली. मात्र, या पावसामुळे या कडधान्याच्या शेतीला बाधा येणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. त्याचबरोबर, काही दिवसांपासून महाड तालुक्यात थंडीने डोके वर काढले असल्याने आंब्याच्या झाडाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. या पावसामुळे हा मोहर गळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.पनवेलमध्ये शहरातील रस्ते ओलेचिंब झाले होते. हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी अद्याप गुलाबी थंडीची चाहूल लागलेली दिसत नसताना पहाटे सुरू झालेल्या अवकाळी पावसाने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पावसात भिजणे टाळण्यासाठी छत्र्यांचा वापर केल्याचे या वेळी दिसून आले.  बोर्ली-मांडला येथे जनजीवन विस्कळीतबोर्ली-मांडला : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी पहाटेपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुरूडसह नांदगाव-मजगांव, बोर्ली-मांडला परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी, बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अचानक हवामात बदल घडून पडलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाताच्या उडव्या, पेंढा भिजल्याने, तसेच शेतात नुकतेच पेरलेल्या वाल, रताळी आदी फळभाजी-पाला व आंब्याच्या पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, येथील शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुरूड तालुक्यात विजेच्या कडकडाटा सह अवकाळी पाऊस आगरदांडा : मुरूड तालुक्यात शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडल्याने रब्बी हंगमात लावलेल्या पिकांना मोठा धोका पोहोचणार आहे.दिवाळीदरम्यान आणि दिवाळीच्या आधीही कोसळलेल्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अधीच हवालदिल झाला आहे. शेतामध्ये कापणी करून ठेवलेली उरले सुरलेले भातपीक पुन्हा पावसाने भिजले. आता पाऊस थांबला असला, तरी ही भिजलेली रोपे आता कुजली आहेत. भात हे मुरूड पंचक्रोशीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. सुरुवातीला सलग तीन वेळा मुसळधार पावसामुळे भातशेतीचे काही प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे उरले-सुरले भात पीक व रब्बी हंगमात लावलेले वाल, चवळी, कलिंगड व अन्य पिकांच्या नुकसानीने शेतकरी चिंतेत आहेत.बागायतदारांना ही अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. फुल बागायती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. फुले पावसात भिजून गेल्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत कृषी कार्यालयानेही कडधान्य पिकांना धोका पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. १५ मिलिमीटर पावसाची नोंदमुरूड तालुक्यात सकाळी ४ पासून ते ९ पर्यंत किमान १५ मिलिमीटर एवढा पाऊस बरसला आहे. त्यामुळे आंब्यासहित कडधान्य पिकालाही धोका पोहोचला आहे. वारंवार अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकरी पुरते हैराण झाले आहेत, परंतु अवकाळी पाऊस थांबत नाही. यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्याची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनास येत आहे.बागायतदारांनाही बसणार फटका कडधान्य घेणारी गावे आंबोली, शिघ्रे, वांदे, उदरगाव, नांदगाव, मजगाव, उसरोली आदी भागांत वाल, सफेद कांदा, चवळी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जतात, परंतु अवकाळी पावसामुळे ही पिके धोक्यात आल्याची  माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. बागायतदारांना ही अवकाळी पावसाचा फटका  बसणार आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड