शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडला अवकाळीचा फटका, आंबा, नारळ, काजू बागांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 01:46 IST

या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा, खालापूर, खोपोली, कर्जत यासह अनेक तालुक्यांत २९ एप्रिलला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बऱ्याच ठिकाणी भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांसंबंधी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात आधीच मोठे संकट उभे राहिले आहे. त्यात बुधवारी रायगड जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. भात, आंबा, काजू, सुपारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे तर वादळी वाºयामुळे झाडे पडून घरांची पडझड झाली आहे. या सर्वांची नुकसानभरपाई लवकर मिळवून देण्यासाठी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट आले असून, देशात व राज्यात या महामारीमुळे घोषित के लेल्या लॉकडाउनचा फटका अनेक गरीब मजुरांना, शेतकऱ्यांना बसला आहे. हे कमी की काय, म्हणून बुधवारी रायगड जिल्ह्यात वादळी वाºयासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान के ले आहे. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. ग्रामीण व काही शहरी भागातील घरांचे पत्रे उडून गेल्याने साठवून ठेवलेल्या अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. आंबा, नारळ, काजूच्या बागांनाही फटका बसला असून, मुरुडमध्ये आंबा बागेतील झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र, तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.>यांच्या घरांचे झाले नुकसानसावळे गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून गेले. तर सावळे गावातील भालचंद्र दळवी, गोपाळ दळवी, संतोष रघुनाथ धुळे, अनंता धुळे, काशीनाथ धुळे, मारुती माळी, अनंता मोडक, दगडू मोडक, मधुकर पोसू धुळे यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पाथरज ग्रामपंचायतीमधील मोरेवाडी येथील अंगणवाडी शाळा आणि एक घरकूल यांचे वादळाने नुकसान केले आहे.>पंचनामे तातडीने करा-तहसीलदारांची सूचनाकर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करावेत, अशा सूचना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिल्या आहेत. महसूल कर्मचारी, वीज वितरण कंपनी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या अधिपत्याखाली येणारी कामे, समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.