शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

रायगडला अवकाळीचा फटका, आंबा, नारळ, काजू बागांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 01:46 IST

या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा, खालापूर, खोपोली, कर्जत यासह अनेक तालुक्यांत २९ एप्रिलला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बऱ्याच ठिकाणी भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांसंबंधी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात आधीच मोठे संकट उभे राहिले आहे. त्यात बुधवारी रायगड जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. भात, आंबा, काजू, सुपारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे तर वादळी वाºयामुळे झाडे पडून घरांची पडझड झाली आहे. या सर्वांची नुकसानभरपाई लवकर मिळवून देण्यासाठी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट आले असून, देशात व राज्यात या महामारीमुळे घोषित के लेल्या लॉकडाउनचा फटका अनेक गरीब मजुरांना, शेतकऱ्यांना बसला आहे. हे कमी की काय, म्हणून बुधवारी रायगड जिल्ह्यात वादळी वाºयासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान के ले आहे. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. ग्रामीण व काही शहरी भागातील घरांचे पत्रे उडून गेल्याने साठवून ठेवलेल्या अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. आंबा, नारळ, काजूच्या बागांनाही फटका बसला असून, मुरुडमध्ये आंबा बागेतील झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र, तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.>यांच्या घरांचे झाले नुकसानसावळे गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून गेले. तर सावळे गावातील भालचंद्र दळवी, गोपाळ दळवी, संतोष रघुनाथ धुळे, अनंता धुळे, काशीनाथ धुळे, मारुती माळी, अनंता मोडक, दगडू मोडक, मधुकर पोसू धुळे यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पाथरज ग्रामपंचायतीमधील मोरेवाडी येथील अंगणवाडी शाळा आणि एक घरकूल यांचे वादळाने नुकसान केले आहे.>पंचनामे तातडीने करा-तहसीलदारांची सूचनाकर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करावेत, अशा सूचना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिल्या आहेत. महसूल कर्मचारी, वीज वितरण कंपनी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या अधिपत्याखाली येणारी कामे, समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.