शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

सर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:21 IST

धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे.

दांडगुरी : देशाला महासत्ता महासत्ता बनवण्यासाठी सर्वधर्मीय जनतेने एकत्रित येण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी केले.श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे मंगळवारी सर्वधर्म समभाव मेळाव्यात ते बोलत होते. तटकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले, त्यांच्या विचारांची परिपूर्तता पुढच्या पिढीत होणे आवश्यक आहे. भगवान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना करत असताना अहिंसेचा विचार त्या वेळी दिला. गौतम बुद्धांनीदेखील अहिंसेचा संदेश देत शांततेचा मार्ग कशाप्रकारे देशात प्रस्थापित होईल याचा प्रयत्न केला. आज त्याच विचारांची गरज असल्याचे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे, असे तटकरेंनी सांगितले.कार्यक्र मात महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी भेट दिली. राजकारण बाजूला ठेवत सर्वधर्म समभाव कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जागतिक राष्ट्रीय विश्वशांतीदूत व जमियते उल्मादेहिंद चे अध्यक्ष सय्यद अर्षद मदनी यांनी विश्वशांतीचा संदेश दिला. मध्यप्रदेश येथील विश्वहिंदू सत्यशोधक मिशन आचार्य शंकराचार्य सत्यानंदजी महाराज, मातंगगड आश्रमचे आचार्य महंत बाबास्वामी सत्यानंदासजी यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून देशात शांतता व देशाची एकता आबाधित राखण्यासाठी विविध उदाहरणे देत उपस्थितांना प्रबोधित केले. महंमद मेमन, निवास गाणेकर, रमेश घरत, सुकुमार तोडलेकर, झोलके पाटील, गणेश पाटील, उदय बापट, अविनाश कोलबेकर, अफजल मेमन, शंकर गाणेकर, एजाज हवालदार, मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.बोर्ली पंचतन व म्हसळा येथील आमरते शिरया हलका आणि अंजुमन दर्दमंदान तालीम व तरक्की यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात यशस्वीपणे पार पडला. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव पवार व दिघी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस