शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:21 IST

धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे.

दांडगुरी : देशाला महासत्ता महासत्ता बनवण्यासाठी सर्वधर्मीय जनतेने एकत्रित येण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी केले.श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे मंगळवारी सर्वधर्म समभाव मेळाव्यात ते बोलत होते. तटकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले, त्यांच्या विचारांची परिपूर्तता पुढच्या पिढीत होणे आवश्यक आहे. भगवान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना करत असताना अहिंसेचा विचार त्या वेळी दिला. गौतम बुद्धांनीदेखील अहिंसेचा संदेश देत शांततेचा मार्ग कशाप्रकारे देशात प्रस्थापित होईल याचा प्रयत्न केला. आज त्याच विचारांची गरज असल्याचे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे, असे तटकरेंनी सांगितले.कार्यक्र मात महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी भेट दिली. राजकारण बाजूला ठेवत सर्वधर्म समभाव कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जागतिक राष्ट्रीय विश्वशांतीदूत व जमियते उल्मादेहिंद चे अध्यक्ष सय्यद अर्षद मदनी यांनी विश्वशांतीचा संदेश दिला. मध्यप्रदेश येथील विश्वहिंदू सत्यशोधक मिशन आचार्य शंकराचार्य सत्यानंदजी महाराज, मातंगगड आश्रमचे आचार्य महंत बाबास्वामी सत्यानंदासजी यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून देशात शांतता व देशाची एकता आबाधित राखण्यासाठी विविध उदाहरणे देत उपस्थितांना प्रबोधित केले. महंमद मेमन, निवास गाणेकर, रमेश घरत, सुकुमार तोडलेकर, झोलके पाटील, गणेश पाटील, उदय बापट, अविनाश कोलबेकर, अफजल मेमन, शंकर गाणेकर, एजाज हवालदार, मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.बोर्ली पंचतन व म्हसळा येथील आमरते शिरया हलका आणि अंजुमन दर्दमंदान तालीम व तरक्की यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात यशस्वीपणे पार पडला. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव पवार व दिघी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस