शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

सर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:21 IST

धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे.

दांडगुरी : देशाला महासत्ता महासत्ता बनवण्यासाठी सर्वधर्मीय जनतेने एकत्रित येण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी केले.श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे मंगळवारी सर्वधर्म समभाव मेळाव्यात ते बोलत होते. तटकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले, त्यांच्या विचारांची परिपूर्तता पुढच्या पिढीत होणे आवश्यक आहे. भगवान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना करत असताना अहिंसेचा विचार त्या वेळी दिला. गौतम बुद्धांनीदेखील अहिंसेचा संदेश देत शांततेचा मार्ग कशाप्रकारे देशात प्रस्थापित होईल याचा प्रयत्न केला. आज त्याच विचारांची गरज असल्याचे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे, असे तटकरेंनी सांगितले.कार्यक्र मात महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी भेट दिली. राजकारण बाजूला ठेवत सर्वधर्म समभाव कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जागतिक राष्ट्रीय विश्वशांतीदूत व जमियते उल्मादेहिंद चे अध्यक्ष सय्यद अर्षद मदनी यांनी विश्वशांतीचा संदेश दिला. मध्यप्रदेश येथील विश्वहिंदू सत्यशोधक मिशन आचार्य शंकराचार्य सत्यानंदजी महाराज, मातंगगड आश्रमचे आचार्य महंत बाबास्वामी सत्यानंदासजी यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून देशात शांतता व देशाची एकता आबाधित राखण्यासाठी विविध उदाहरणे देत उपस्थितांना प्रबोधित केले. महंमद मेमन, निवास गाणेकर, रमेश घरत, सुकुमार तोडलेकर, झोलके पाटील, गणेश पाटील, उदय बापट, अविनाश कोलबेकर, अफजल मेमन, शंकर गाणेकर, एजाज हवालदार, मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.बोर्ली पंचतन व म्हसळा येथील आमरते शिरया हलका आणि अंजुमन दर्दमंदान तालीम व तरक्की यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात यशस्वीपणे पार पडला. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव पवार व दिघी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस