शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

दुर्दैवी! पाच किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला डोलीतून; रस्त्याअभावी चिंभावेवासीयांची फरफट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:32 IST

भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: वाडीत जाणारा रस्ताच नसल्याने एकाचा मृतदेह चक्क पाच किलोमीटरपर्यंत डोलीतून न्यावा लागल्याचा प्रकार चिंभावे धनगरवाडीत समोर आला आहे. या घटनेमुळे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धनगरवाडीतील दीपेश माने याचा ठाण्यातील मानपाडा येथे ९ ऑगस्टला मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह चिंभावे गावी आणला. मात्र धनगरवाडीतील त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ताच शिल्लक राहिलेला नसल्याने रुग्णवाहिका वाडीच्या वेशीवरच थांबवण्यात आली आणि त्यानंतर भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली.

पावसामुळे हा सगळा रस्ता चिखलमय झालेला असल्याने पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची ये-जा अशक्य होते. त्यामुळे वाडीत कोणालाही डॉक्टरकडे ने-आण करण्यासाठी डोलीतूनच न्यावे लागते. या परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेकांचे प्राण गेल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

निधी झाला मंजूर,पण रस्ता कधी?

यापूर्वी महाडचे माजी आमदार शांताराम फिलसे यांच्या काळात वाडीपर्यंत जाणारा रस्ता बांधण्यात आला होता. आता आमदार भरत गोगावले यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला. पण पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळूनही या रस्त्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. त्यामुळे निधी मंजूर असून रस्ता का होत नाही, असा सवाल धनगरवाडीवासीयांकडून उपस्थित केला आहे.

निवडणुका तोंडावर आल्या की रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. निवडून आल्यावर रस्ता पक्का करून देतो, असे आश्वासन दिले जाते. परंतु नंतर सर्व जण दुर्लक्ष करतात. स्वतंत्र भारताचा धनगरवाडीही एक भाग आहे, हे लक्षात घेऊन सरकारने रस्ता व इतर सुविधा देऊन आम्हालाही विकासाच्या प्रवाहात आणावे.- नामदेव ढेबे, ग्रामस्थ, धनगरवाडी-चिंभावे

टॅग्स :alibaugअलिबाग