शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दुर्दैवी! पाच किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला डोलीतून; रस्त्याअभावी चिंभावेवासीयांची फरफट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:32 IST

भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: वाडीत जाणारा रस्ताच नसल्याने एकाचा मृतदेह चक्क पाच किलोमीटरपर्यंत डोलीतून न्यावा लागल्याचा प्रकार चिंभावे धनगरवाडीत समोर आला आहे. या घटनेमुळे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धनगरवाडीतील दीपेश माने याचा ठाण्यातील मानपाडा येथे ९ ऑगस्टला मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह चिंभावे गावी आणला. मात्र धनगरवाडीतील त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ताच शिल्लक राहिलेला नसल्याने रुग्णवाहिका वाडीच्या वेशीवरच थांबवण्यात आली आणि त्यानंतर भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली.

पावसामुळे हा सगळा रस्ता चिखलमय झालेला असल्याने पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची ये-जा अशक्य होते. त्यामुळे वाडीत कोणालाही डॉक्टरकडे ने-आण करण्यासाठी डोलीतूनच न्यावे लागते. या परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेकांचे प्राण गेल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

निधी झाला मंजूर,पण रस्ता कधी?

यापूर्वी महाडचे माजी आमदार शांताराम फिलसे यांच्या काळात वाडीपर्यंत जाणारा रस्ता बांधण्यात आला होता. आता आमदार भरत गोगावले यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला. पण पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळूनही या रस्त्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. त्यामुळे निधी मंजूर असून रस्ता का होत नाही, असा सवाल धनगरवाडीवासीयांकडून उपस्थित केला आहे.

निवडणुका तोंडावर आल्या की रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. निवडून आल्यावर रस्ता पक्का करून देतो, असे आश्वासन दिले जाते. परंतु नंतर सर्व जण दुर्लक्ष करतात. स्वतंत्र भारताचा धनगरवाडीही एक भाग आहे, हे लक्षात घेऊन सरकारने रस्ता व इतर सुविधा देऊन आम्हालाही विकासाच्या प्रवाहात आणावे.- नामदेव ढेबे, ग्रामस्थ, धनगरवाडी-चिंभावे

टॅग्स :alibaugअलिबाग