शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला दोन हजार ५०० लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:37 IST

आदेशाचा गैरफायदा घेत मोडले नियम

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते; परंतु कोरोना जसाजसा कमी होऊ लागला तसतशी टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती. लग्नसमारंभाला मंजुरी देण्यात आली. ५० लोकांच्या आतच लग्न समारंभ करा, असे आदेश शासन, प्रशासनाने दिले; परंतु या आदेशाचा गैरफायदा घेत लग्नाचा बारच फुटला. सुरुवातीला काहींनी परवानगी घेतली; मात्र आता ५०० ते ८०० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ केले गेले.सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने दररोज लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथी, ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. जिल्ह्यातील गावांपैकी असा एकही गाव शिल्लक नाही ज्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. जोमाने लग्न समारंभ पार पाडण्यात आले. डिजे, ढोल यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले.जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात एकही दिवस नाही की लग्न झाली नाहीत. त्यामुळे लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी, आज कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिक आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे  चिंता आणि भीती वाढली आहे.जिल्ह्यात झाली २१५ रजिस्टर लग्नकोरोनाच्या काळात कमी पैशात लग्न करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे, तसेच जिल्ह्यातील २१५ नव दाम्पत्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे. कोरोनामुळे नगरिकांनी सध्या कमी खर्चात, कमी लोकांत लग्न करणे पसंत केले.

एप्रिल कठीणच गेल्या वर्षापासून यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत झालेल्या लग्न समारंभामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ही परिस्थिती सावरणे आता एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात ४ तारखेपासूनच सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली, तरीही लोक लग्न समारंभ करीतच आहेत.

मंगल कार्यालयचालकांच्या प्रतिक्रियाकोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लग्न समारंभात वऱ्हाड्यांची घालून दिलेली अट ही मंगल कार्यालयात लग्न करण्यासाठी कारणीभूत ठरली. कमी लोकांत लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करावे, असे लोकांना वाटले. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले, त्यामुळे लावलेली रक्कम निघाली नाही.- मंगेश कोर्लेकरकोरोनाच्या संसर्गामुळे दरवर्षीच्या तुलनेत अर्धे लग्न समारंभही आमच्याकडे झाले नाहीत. ५0 लोकांच्या आतच लग्न आटोपण्याचा सरकारचा आदेश असल्याने लोकांनी मंगल कार्यालयात लग्न करण्यापेक्षा घरीच लग्न करणे पसंत केले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला आहे.- राकेश थळे

टॅग्स :marriageलग्न