शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे धरमतरकडे निघालेल्या दोन बार्ज भरकटल्या: दोन्ही बार्ज उरणच्या किनाऱ्यावर: कर्मचारी सुखरूप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 22:50 IST

Uran: मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत.

- मधुकर ठाकूरउरण : मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवीमुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

मुंबईकडून मंगळवारी  ( ९ ) एसएन ऑल कंपनीचै  ( ९ ) एमव्ही- श्रीकांत आणि अरब इंटरप्राईझेस कंपनीचे एमव्ही- जी-२  या दोन मालवाहू बार्ज  रायगड जिल्ह्यातील धरमतर येथील इस्पात कंपनीकडे निघाल्या होत्या.मात्र वादळामुळे समुद्रात उसळणाऱ्या उंचच लाटांमुळे नांगर तोडून या दोन्ही बार्ज भरकटून उरण तालुक्यातील केगाव - माणकेश्वर मंदिराच्या किनाऱ्यावर येऊन ठेपल्या आहेत.एमव्ही- श्रीकांत ही रिकामी बार्ज केगाव - माणकेश्वर मंदिराजवळील तर एमव्ही- जी-२ अरब इंटरप्राईझेस ही दुसरी बार्ज सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजा-एनएडी नेव्ही जेट्टीच्या खडकाळ किनाऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लागल्या आहेत.

या दोन्ही मालवाहू बार्जची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरने पाहणी केली.तसेच नवीमुंबई  सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस अधिकारी पृथ्वीराज भामरे आणि तहसिलदारांच्या पथकाने पाहणी केली आहे.या दोन्ही बार्जवर पण प्रत्येकी पाच-सहा खलाशी आहेत. या दोन्ही बार्जच्या  खलाशांकडे मदत हवी नको यासाठीही चौकशी करण्यात आली.मदतीची आवश्यकता नसल्याचे  कर्मचाऱ्यांनी सांगितले. चौकशीअंती रेडॲलर्ट उठविण्यात आल्यानंतर दोन्ही बार्ज इच्छीत स्थळी धरमतरकडे रवाना होणार आहेत.तसेच कर्मचाऱ्यांनीही आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे कळविले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड