शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वादळामुळे धरमतरकडे निघालेल्या दोन बार्ज भरकटल्या: दोन्ही बार्ज उरणच्या किनाऱ्यावर: कर्मचारी सुखरूप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 22:50 IST

Uran: मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत.

- मधुकर ठाकूरउरण : मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवीमुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

मुंबईकडून मंगळवारी  ( ९ ) एसएन ऑल कंपनीचै  ( ९ ) एमव्ही- श्रीकांत आणि अरब इंटरप्राईझेस कंपनीचे एमव्ही- जी-२  या दोन मालवाहू बार्ज  रायगड जिल्ह्यातील धरमतर येथील इस्पात कंपनीकडे निघाल्या होत्या.मात्र वादळामुळे समुद्रात उसळणाऱ्या उंचच लाटांमुळे नांगर तोडून या दोन्ही बार्ज भरकटून उरण तालुक्यातील केगाव - माणकेश्वर मंदिराच्या किनाऱ्यावर येऊन ठेपल्या आहेत.एमव्ही- श्रीकांत ही रिकामी बार्ज केगाव - माणकेश्वर मंदिराजवळील तर एमव्ही- जी-२ अरब इंटरप्राईझेस ही दुसरी बार्ज सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजा-एनएडी नेव्ही जेट्टीच्या खडकाळ किनाऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लागल्या आहेत.

या दोन्ही मालवाहू बार्जची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरने पाहणी केली.तसेच नवीमुंबई  सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस अधिकारी पृथ्वीराज भामरे आणि तहसिलदारांच्या पथकाने पाहणी केली आहे.या दोन्ही बार्जवर पण प्रत्येकी पाच-सहा खलाशी आहेत. या दोन्ही बार्जच्या  खलाशांकडे मदत हवी नको यासाठीही चौकशी करण्यात आली.मदतीची आवश्यकता नसल्याचे  कर्मचाऱ्यांनी सांगितले. चौकशीअंती रेडॲलर्ट उठविण्यात आल्यानंतर दोन्ही बार्ज इच्छीत स्थळी धरमतरकडे रवाना होणार आहेत.तसेच कर्मचाऱ्यांनीही आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे कळविले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड