शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:41 IST

जांभूळवाडी, नवसूचीवाडी, हऱ्याचीवाडी रस्त्यांची दुरवस्था; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष; रस्ता नसल्याने रुग्ण, विद्यार्थ्यांचे हाल

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यात खांडस येथील जांभूळवाडी, हºयाचीवाडी, नवसूचीवाडी या आदिवासी वाडीतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावात वाहन येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करावी लागते. याबाबत आदिवासी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून रस्त्यांना वाली कोण, असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडला आहे.कर्जतपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जांभूळवाडी, हºयाचीवाडी, नवसूचीवाडी या आदिवासी वस्ती असलेल्या वाड्या असून कर्जत-मुरबाड राज्य मार्गालगत असलेला कुरुंग, ताडवाडी खांडस या रस्त्याला जोडून या वाड्या पाड्यांना जोडणारे हे अंतर्गत रस्ते आहेत. सुमारे २० वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या आमदार निधीतून करण्यात आले होते.जिल्हा परिषद अंतर्गत हे रस्ते येत असून, योग्य देखभालीअभावी या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडलेली आहे. या रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीदवाक्य मिरवणारे परिवहन खात्याची बस सेवाही नसल्याने येथील आदिवासींना दळणवळणाची सोय नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रथम त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालून वारे गाव गाठावे लागते. त्यानंतरच त्यांना उपलब्ध वाहनाच्या साह्याने तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचता येते.अनेक आदिवासी आपल्या उपजीविकेसाठी शेती, तसेच भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र, त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला विक्र ीसाठी बाजारपेठेत नेण्याकरिता खराब रस्त्याअभावी व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आदिवासींना बोजा डोक्यावर घेऊन मार्गक्र मण करावे लागते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी झाल्यास किंवा महिला गरोदर असल्यास आरोग्य केंद्रात नेण्याकरिता चादरीची झोळी करून चार ते पाच किलोमीटरचे अंतर पार करावयास लागत असल्याचे चित्र या भागात दिसून येते. तालुक्यातही प्रमुख रस्त्याकडे तर प्रसार माध्यमासहित प्रशासनाचेही लक्ष जाते व तातडीने रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, या वाड्या पाड्यातील अंतर्गत रस्ते मात्र दुर्लक्षितच होत आहेत. या रस्त्यांना वाली कोण ? हा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.निवडणुका आल्या की, येथील आदिवासी बांधवांवर उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जाते; परंतु निवडणुका झाल्या की या आश्वासनांचा विसर पडतो. त्यामुळे वर्षानुवर्षे आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित राहतात. विशेष म्हणजे आदिवासी भागात वीज, रस्ते नसल्यानेच येथील तरु ण शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात विविध पक्षाचे नेते मंडळी येणार म्हणून तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी केली जाते, यासाठी बांधकाम विभागाची धावपळ सुरू असते. मात्र, २० ते २५ वर्षांपासून या आदिवासी भागातील रस्त्यांवर साधी डागडुजीही होत नाही.आदिवासी भागात गेल्या २० वर्षांपासून रस्ते चांगले झाले नाहीत. रस्त्यावर खडीही राहिलेली नाही अशी अवस्था रस्त्यांची आहे, मोटारसायकल चालवणेही कठीण झाले आहे, त्यामुळे मोठा त्रास आमच्या आदिवासी बांधवांना होत आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन रस्ते तरी चांगल्या दर्जाचे करावेत.- मारु ती पारधी,ग्रामस्थ, जांभूळवाडी

टॅग्स :Raigadरायगड