शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:41 IST

जांभूळवाडी, नवसूचीवाडी, हऱ्याचीवाडी रस्त्यांची दुरवस्था; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष; रस्ता नसल्याने रुग्ण, विद्यार्थ्यांचे हाल

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यात खांडस येथील जांभूळवाडी, हºयाचीवाडी, नवसूचीवाडी या आदिवासी वाडीतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावात वाहन येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करावी लागते. याबाबत आदिवासी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून रस्त्यांना वाली कोण, असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडला आहे.कर्जतपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जांभूळवाडी, हºयाचीवाडी, नवसूचीवाडी या आदिवासी वस्ती असलेल्या वाड्या असून कर्जत-मुरबाड राज्य मार्गालगत असलेला कुरुंग, ताडवाडी खांडस या रस्त्याला जोडून या वाड्या पाड्यांना जोडणारे हे अंतर्गत रस्ते आहेत. सुमारे २० वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या आमदार निधीतून करण्यात आले होते.जिल्हा परिषद अंतर्गत हे रस्ते येत असून, योग्य देखभालीअभावी या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडलेली आहे. या रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीदवाक्य मिरवणारे परिवहन खात्याची बस सेवाही नसल्याने येथील आदिवासींना दळणवळणाची सोय नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रथम त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालून वारे गाव गाठावे लागते. त्यानंतरच त्यांना उपलब्ध वाहनाच्या साह्याने तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचता येते.अनेक आदिवासी आपल्या उपजीविकेसाठी शेती, तसेच भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र, त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला विक्र ीसाठी बाजारपेठेत नेण्याकरिता खराब रस्त्याअभावी व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आदिवासींना बोजा डोक्यावर घेऊन मार्गक्र मण करावे लागते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी झाल्यास किंवा महिला गरोदर असल्यास आरोग्य केंद्रात नेण्याकरिता चादरीची झोळी करून चार ते पाच किलोमीटरचे अंतर पार करावयास लागत असल्याचे चित्र या भागात दिसून येते. तालुक्यातही प्रमुख रस्त्याकडे तर प्रसार माध्यमासहित प्रशासनाचेही लक्ष जाते व तातडीने रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, या वाड्या पाड्यातील अंतर्गत रस्ते मात्र दुर्लक्षितच होत आहेत. या रस्त्यांना वाली कोण ? हा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.निवडणुका आल्या की, येथील आदिवासी बांधवांवर उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जाते; परंतु निवडणुका झाल्या की या आश्वासनांचा विसर पडतो. त्यामुळे वर्षानुवर्षे आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित राहतात. विशेष म्हणजे आदिवासी भागात वीज, रस्ते नसल्यानेच येथील तरु ण शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात विविध पक्षाचे नेते मंडळी येणार म्हणून तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी केली जाते, यासाठी बांधकाम विभागाची धावपळ सुरू असते. मात्र, २० ते २५ वर्षांपासून या आदिवासी भागातील रस्त्यांवर साधी डागडुजीही होत नाही.आदिवासी भागात गेल्या २० वर्षांपासून रस्ते चांगले झाले नाहीत. रस्त्यावर खडीही राहिलेली नाही अशी अवस्था रस्त्यांची आहे, मोटारसायकल चालवणेही कठीण झाले आहे, त्यामुळे मोठा त्रास आमच्या आदिवासी बांधवांना होत आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन रस्ते तरी चांगल्या दर्जाचे करावेत.- मारु ती पारधी,ग्रामस्थ, जांभूळवाडी

टॅग्स :Raigadरायगड