शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:48 IST

जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समुह राहतात.

- जयंत धुळप 

अलिबाग - जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समुह राहतात. आपला हा नैसर्गीक वारसा आपल्या आयूष्याकरीता आपणच जोपासायला हवा, या हेतूने महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील आदिवासी मुले या वारसा जतनाकरिता सज्ज झाली असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

पश्चिम घाटातील ठासळत्या नैसर्गिक संतुलनाचा विपरित परिणाम

जैवविविधतेच्या दृष्ट्रीने अत्यंतिक संवेदनशील अशा या पश्चिम घाटात कोकणातील सिंधुदुर्ग व रायगड येथील अनेक आदिवासी व बिगरआदिवासी गाव समूहांचा समावेश आहे. पश्चिम घाटातील खाणी, अभयारण्याच्या सभोवताली झालेली वृक्षतोड, परंपरागत जंगलनिवासींची बदललेली शेती पद्धती व वन्य प्राण्यांची शिकार या सारख्या अनेक बाबींमुळे पश्चिम घाटातील नैसर्गिक संतुलन  वेगाने ढासळत आहे. यांचाच विपरित परिणाम म्हणून भूस्सखलन,  महापूर,  अतिवृष्टी तसेच दुष्काळ आदींसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले.

‘पश्चिम घाट वाचवा’अभियानामार्फत 62 मुलांना प्रशिक्षण

  याच ठासळत्या नैसर्गिक संतुलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील होश्यागडी येथील जंगलात ‘पश्चिम घाट वाचवा’ या अभियानामार्फत दि. 25 ते 29 एप्रिल 2क्18 या दरम्यान किशोरवयीन मुला-मुलींचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या  शिबिरात एन्वायरमेंटल स्टडी सेंटर व प्रकृती या दोन संस्थांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या मध्ये महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी राज्यातील एकूण 62 मुले व मुली सहभागी झाल्याचे त्यांनी सांगीतले.

 

कोकणातील 16 आदिवासी मुलांचा सक्रीय सहभाग

कोकणातून अंकुर ट्रस्ट या संस्थेमार्फत आदिवासी, धनगर तर चाईल्ड हेवन येथील निराश्रीत मुले असे एकूण 16 किशोरवयीन मुलांचा चमू  व कर्मचारी सनिश म्हात्ने,  संजय नाईक तसेच गटप्रमुख ईला गोरे व गार्गी पाटील आदी सहभागी झाले होते. कर्नाटकातून आलेल्या या प्रशिक्षित मुलांनी त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणा बाबत संपुर्ण माहिती येथे देवून, हा जैवविधतेचा वारसा जतन करण्याकरिता सक्रीय होण्याचा मानस व्यक्त केला असल्याचे डॉ. वैशाली पाटील यांनी सांगीतले. 

62 आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धिंगत करणार

 पश्चिम घाट वाचवा या अभियानातील आपले भावी संकल्प देखील या मुलांनी तयार केले असून महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातील या 62 आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धीगत करण्याचा त्यांचा संकल्प महत्वपूर्ण असल्याचे डॉ.पाटील यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Natureनिसर्गRaigadरायगडkonkanकोकणnewsबातम्या