शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:48 IST

जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समुह राहतात.

- जयंत धुळप 

अलिबाग - जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समुह राहतात. आपला हा नैसर्गीक वारसा आपल्या आयूष्याकरीता आपणच जोपासायला हवा, या हेतूने महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील आदिवासी मुले या वारसा जतनाकरिता सज्ज झाली असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

पश्चिम घाटातील ठासळत्या नैसर्गिक संतुलनाचा विपरित परिणाम

जैवविविधतेच्या दृष्ट्रीने अत्यंतिक संवेदनशील अशा या पश्चिम घाटात कोकणातील सिंधुदुर्ग व रायगड येथील अनेक आदिवासी व बिगरआदिवासी गाव समूहांचा समावेश आहे. पश्चिम घाटातील खाणी, अभयारण्याच्या सभोवताली झालेली वृक्षतोड, परंपरागत जंगलनिवासींची बदललेली शेती पद्धती व वन्य प्राण्यांची शिकार या सारख्या अनेक बाबींमुळे पश्चिम घाटातील नैसर्गिक संतुलन  वेगाने ढासळत आहे. यांचाच विपरित परिणाम म्हणून भूस्सखलन,  महापूर,  अतिवृष्टी तसेच दुष्काळ आदींसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले.

‘पश्चिम घाट वाचवा’अभियानामार्फत 62 मुलांना प्रशिक्षण

  याच ठासळत्या नैसर्गिक संतुलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील होश्यागडी येथील जंगलात ‘पश्चिम घाट वाचवा’ या अभियानामार्फत दि. 25 ते 29 एप्रिल 2क्18 या दरम्यान किशोरवयीन मुला-मुलींचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या  शिबिरात एन्वायरमेंटल स्टडी सेंटर व प्रकृती या दोन संस्थांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या मध्ये महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी राज्यातील एकूण 62 मुले व मुली सहभागी झाल्याचे त्यांनी सांगीतले.

 

कोकणातील 16 आदिवासी मुलांचा सक्रीय सहभाग

कोकणातून अंकुर ट्रस्ट या संस्थेमार्फत आदिवासी, धनगर तर चाईल्ड हेवन येथील निराश्रीत मुले असे एकूण 16 किशोरवयीन मुलांचा चमू  व कर्मचारी सनिश म्हात्ने,  संजय नाईक तसेच गटप्रमुख ईला गोरे व गार्गी पाटील आदी सहभागी झाले होते. कर्नाटकातून आलेल्या या प्रशिक्षित मुलांनी त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणा बाबत संपुर्ण माहिती येथे देवून, हा जैवविधतेचा वारसा जतन करण्याकरिता सक्रीय होण्याचा मानस व्यक्त केला असल्याचे डॉ. वैशाली पाटील यांनी सांगीतले. 

62 आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धिंगत करणार

 पश्चिम घाट वाचवा या अभियानातील आपले भावी संकल्प देखील या मुलांनी तयार केले असून महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातील या 62 आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धीगत करण्याचा त्यांचा संकल्प महत्वपूर्ण असल्याचे डॉ.पाटील यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Natureनिसर्गRaigadरायगडkonkanकोकणnewsबातम्या