शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:48 IST

जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समुह राहतात.

- जयंत धुळप 

अलिबाग - जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समुह राहतात. आपला हा नैसर्गीक वारसा आपल्या आयूष्याकरीता आपणच जोपासायला हवा, या हेतूने महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील आदिवासी मुले या वारसा जतनाकरिता सज्ज झाली असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

पश्चिम घाटातील ठासळत्या नैसर्गिक संतुलनाचा विपरित परिणाम

जैवविविधतेच्या दृष्ट्रीने अत्यंतिक संवेदनशील अशा या पश्चिम घाटात कोकणातील सिंधुदुर्ग व रायगड येथील अनेक आदिवासी व बिगरआदिवासी गाव समूहांचा समावेश आहे. पश्चिम घाटातील खाणी, अभयारण्याच्या सभोवताली झालेली वृक्षतोड, परंपरागत जंगलनिवासींची बदललेली शेती पद्धती व वन्य प्राण्यांची शिकार या सारख्या अनेक बाबींमुळे पश्चिम घाटातील नैसर्गिक संतुलन  वेगाने ढासळत आहे. यांचाच विपरित परिणाम म्हणून भूस्सखलन,  महापूर,  अतिवृष्टी तसेच दुष्काळ आदींसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले.

‘पश्चिम घाट वाचवा’अभियानामार्फत 62 मुलांना प्रशिक्षण

  याच ठासळत्या नैसर्गिक संतुलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील होश्यागडी येथील जंगलात ‘पश्चिम घाट वाचवा’ या अभियानामार्फत दि. 25 ते 29 एप्रिल 2क्18 या दरम्यान किशोरवयीन मुला-मुलींचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या  शिबिरात एन्वायरमेंटल स्टडी सेंटर व प्रकृती या दोन संस्थांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या मध्ये महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी राज्यातील एकूण 62 मुले व मुली सहभागी झाल्याचे त्यांनी सांगीतले.

 

कोकणातील 16 आदिवासी मुलांचा सक्रीय सहभाग

कोकणातून अंकुर ट्रस्ट या संस्थेमार्फत आदिवासी, धनगर तर चाईल्ड हेवन येथील निराश्रीत मुले असे एकूण 16 किशोरवयीन मुलांचा चमू  व कर्मचारी सनिश म्हात्ने,  संजय नाईक तसेच गटप्रमुख ईला गोरे व गार्गी पाटील आदी सहभागी झाले होते. कर्नाटकातून आलेल्या या प्रशिक्षित मुलांनी त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणा बाबत संपुर्ण माहिती येथे देवून, हा जैवविधतेचा वारसा जतन करण्याकरिता सक्रीय होण्याचा मानस व्यक्त केला असल्याचे डॉ. वैशाली पाटील यांनी सांगीतले. 

62 आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धिंगत करणार

 पश्चिम घाट वाचवा या अभियानातील आपले भावी संकल्प देखील या मुलांनी तयार केले असून महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातील या 62 आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धीगत करण्याचा त्यांचा संकल्प महत्वपूर्ण असल्याचे डॉ.पाटील यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Natureनिसर्गRaigadरायगडkonkanकोकणnewsबातम्या