शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

रायगड जिल्ह्यातील रुग्णांवर पनवेलच्या एमजीएममध्येच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:36 PM

आदिती तटकरे : अलिबाग, महाड, माणगावमध्ये संशयितांवर उपचार

आविष्कार देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोनाबाधित तसेच अत्यावस्थ रुग्णांवर आता पनवेल येथील एमजीएम रुग्णालयातच उपचार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माणगाव या ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित आणि कोरोनाचा कमी त्रास असणाऱ्या रुग्णांना ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

लॉकडाउननंतर कोकणामध्ये सुमारे सात लाख नागरिक आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रायगड जिल्ह्यामध्ये आले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लाखोंच्या संख्येने नागरिकांनी आपापले घर गाठले. बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये कोविड-१९ रुग्णालये (डीसीएच), कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि कोविड उपचार केंद्र (सीसीसी) अशा आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांवर उपचार करताना आता वर्गीकरण करण्यात येणार आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पनवेल, एमजीएम यासह अन्य ठिकाणी रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सापडणाºया रुग्णांवर विशेषत: ज्यांची प्रकृती अस्वस्थ आहे आणि ज्यांना कोरोना झाला आहे. त्यांच्यावर पनवेल, एमजीएम येथे उपचार करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माणगाव या ठिकाणी फक्त कोरोना संशयितांनाच भरती करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.कोरोनाबाधितांवर उपचार करताना जे कोणी आरोग्य कर्मचारी त्यांच्या संपर्कात येणार असतील, त्या सर्र्वांना पीपीई किट, हॅण्डग्लोव्हज्, मास्क अशा आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याबाबत आधीच सूचना दिलेल्या आहेत. याबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिल्याचेही तटकरे यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांचा कामास नकारअलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील दोन वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाल्याने अन्य कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संरक्षण साधन दिल्यावरच काम करू, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. प्रमोद गवई यांनी कर्मचाºयांचे म्हणणे ऐकून घेतले; मात्र त्यानंतर थेट आयुक्तांच्या व्हीसीमध्ये निघून गेले. त्यांनीच पोलिसांना पाचारण केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला. याबाबत डॉ. गवई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्हीसीमध्ये असल्याचे सांगितले.जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांमुळे धोका वाढण्याची शक्यता गृहीत धरून ४ हजार ६०० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला. बाहेरून आलेल्या बहुतांश नागरिकांनी आतापर्यंत१४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. १६ मेनंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आलेल्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याने पुढील आठ दिवस जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.