शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

माणगावमधून रेल्वे जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:36 IST

खासदार सुनील तटकरे यांची कोकण रेल्वे चेअरमन यांना ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव शहरात कोकण रेल्वे दुपदरीकरणाच्या उंच भरावांमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. या आधी दोन वेळा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी त्यावर योग्य ती कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही हे प्रत्यक्षात कचेरी रोड येथे स्वतः जाऊन खासदार सुनील तटकरे यांनी पाहणी केले असता निदर्शनास आले. त्यावर कोकण रेल्वे चेअरमन यांना संपर्क केला असता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ते काम करा अन्यथा माणगाव शहरातून रेल्वे जाऊ दिली जाणार नाही, अशी सक्त ताकीद खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

१ मार्च रोजी माणगाव तहसील कार्यालय येथे खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ज्या समस्या माणगावकरांना भेडसावत आहे त्याचे निवारण करून लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश खासदार सुनील तटकरे  यांनी कोकण रेल्वे, एमएसआरडीसी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  मोर्बा रोडवर गेली अनेक वर्षे गटाराचा प्रश्न प्रलंबित आहे. तेथेही प्रत्यक्षात खा. तटकरे यांनी भेट देऊन गटाराचा प्रश्न लवकर मार्गी लावावा व उपजिल्हा रुग्णालयासमोरील विद्युतीकरणाचे काम म्हणजे विद्युत खांब हलविणे लवकर करावे असे आदेश विद्युत मंडळ अधीक्षक अभियंता यांना दिले. निजामपूर रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ एमएसआरडीसीने केलेल्या कामामुळे नैसर्गिक होणाऱ्या पाण्याचा निचऱ्याला अडथळा निर्माण झालेला आहे. तिथे येत्या ४ दिवसात महामार्ग अधिकाऱ्यांनी पाहणी करून स्लॅब ड्रेनेजचे तसेच आवश्यक ते काम करावे असेही आदेश देण्यात आले. यावेळी माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, नितीन वाढवळ आदी नगरसेवक, कोकण रेल्वे, एमएसआरडीसी, एमएसईबी अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

काम गतीने पूर्ण करावेमुंबई-गोवा, दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुधाराव्या व काम जलद गतीने पूर्ण करावे. तसेच अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे माणगाव येथे बंद करण्यात आले आहेत. याबाबत रेल्वे पूर्णतः मार्गावर सुरू झाल्यानंतर माणगाव येथे सर्व गाड्यांचे थांबे देण्यात यावेत व माणगाव येथे मोठे जंक्शन करण्यात यावे, यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचीही लवकरात लवकर भेट घेणार असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.