शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये 4 दिवाळ्या, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

सावित्री नदीवरील तुटलेल्या कठड्यामुळे वाहतुकीस धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 03:01 IST

यंदाच्या पावसाळ्यात महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यानंतर मातीचा ढिगारा साफ करताना सावित्री नदीलगतचा कठडा तोडण्यात आला.

- सिकंदर अनवारे दासगाव : यंदाच्या पावसाळ्यात महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यानंतर मातीचा ढिगारा साफ करताना सावित्री नदीलगतचा कठडा तोडण्यात आला. मात्र अद्याप त्याची दुरुस्ती किंवा त्याठिकाणी दुसरा कठडा न बांधल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणात महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीत वळणावरील फोडण्यात आलेला डोंगर राष्टÑीय महामार्गाच्या वाहतुकीस सध्या डोकेदुखी ठरत आहे.एका बाजूने सावित्री नदी दुसऱ्या बाजूने डोंगरातून महामार्गावरील वाहतूक सुरू आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे चौपदरीकरणाचे काम अपूर्णच राहिले आहे. पावसाच्या सुरुवातीलाच तीन वेळा मातीचा ढिगारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.५ जुलै रोजी सकाळी मातीचा ढिगारा येऊन महामार्गावर कोसळला. हा मातीचा ढिगारा उपसण्यासाठी तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी जवळपास ५ तास लागले.चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीने जेसीबी आणि इतर माती उपसण्याच्या यंत्रणेद्वारे कोसळलेला मातीचा ढिगारा शेजारी असलेल्या सावित्री नदीत लोटला. यावेळी महामार्गावरील सावित्री नदीला लागून असलेला संरक्षण कठडा तोडण्यात आला. मात्र नंतर या ठिकाणी दक्षता म्हणून किंवा सुरक्षा म्हणून कोणतीच खबरदारी घेण्यात आलेली नाही. दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून संपूर्ण महामार्ग त्यांच्या ताब्यात देण्यात आला असल्याने या ठिकाणी तोडण्यात आलेल्या कठड्याकडे महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे.सध्या ठेकेदार कंपनी देखील लक्ष देत नाही आणि महामार्ग विभाग देखील लक्ष देत नाही. त्यामुळे याठिकाणाच्या महामार्गावरील वाहतूक धोक्यात आली असून अपघाताला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. यामुळे सध्या प्रवासी वर्गामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.दरड कोसळल्यानंतर याठिकाणची पाहणी महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांकडून करण्यात आली होती व धोकादायक स्थिती असल्याचे पत्र देखील ठेकेदार कंपनीला यांचेकडून देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.>अरुंद रस्त्यामुळे बसणार फटकाचौपदरीकरणाच्या खोदकामानंतर पावसामध्ये तीन वेळा या ठिकाणी मातीचा ढिगारा महामार्गावर येऊन कोसळला. मातीच्या ढिगाºयामुळे काही माती आजही रस्त्याच्याकडेला आहे. त्यामुळे साइडपट्टी कमकुवत झाली आहे. ठेकेदाराकडून रस्त्यावरच गार्ड लावण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीसाठी महामार्ग अरुंद झाला असून मोठ्या प्रमाणात वळणाचा भाग आहे. समोरुन येणारे वाहन एकामेकाला लगेच दिसत नाही. व पुन्हा सावित्री नदीला लागून असलेला तुटलेला कठडा (संरक्षण भिंत) दोन्ही बाजूने मोठी वाहन याठिकाणी आली तर धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यामुळे सुरक्षा म्हणून कठडा असणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे, अन्यथा सावित्री नदीमध्ये एक वाहन कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.>महामार्गावरील मातीचा ढिगारा उपसण्यात आला त्यावेळी मातीखाली टाकण्यासाठी नदीला लागून असलेला संरक्षण कठडा हा तोडण्यात आला. संबंधित ठेकेदार कंपनीला कठडा बांधण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.- सचिन गवळी, पोलीस उप. निरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा पोलीस