शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल ३ तास वाहतूक कोंडी; वडखळ-कोलाडदरम्यान वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 07:05 IST

एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल तीन तासांचा वेळ खर्ची करावा लागला.

अनिल पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, नागोठणे : मुंबई-गोवामहामार्गावर वडखळ-कोलाडदरम्यान शनिवारी पहाटे साडेपाचपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल तीन तासांचा वेळ खर्ची करावा लागला.

मे महिन्याच्या सुटीबरोबरच शनिवार-रविवारला जोडून सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुटी आणि लग्नसराईमुळे मुंबई-गोवामहामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली. वडखळपासून आमटेमपर्यंत कासवगतीने वाहतूक सुरू होती. आमटेम ते कोलेटीदरम्यान वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणची वाहतूक जिल्हा वाहतूक पोलिस व महामार्ग वाहतूक पोलिसांना तीन तासांनंतर सुरळीत करण्यास यश आले.

निडी ते नागोठणे फाटा येथे सकाळी ८ वाजल्यापासून बेशिस्त वाहन चालकांमुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली. येथेही वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी जिल्हा वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने चार तासांनी १२ वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. यामुळे वडखळ-कोलाड या तासाभराच्या प्रवासाला तीन तास लागल्याने प्रवाशांची दमछाक झाली.

चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, वाहनांची वाढली संख्या

मुंबई-गोवा महामार्गावर अनेक भागांत चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. यामुळे वाहनांची संख्या वाढलेली असताना काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होते. विशेषतः सणासुदीचा काळ आणि सुट्यांदरम्यान ही समस्या अधिक तापदायक ठरते.

 

टॅग्स :Mumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग