शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पावसाच्या तडाख्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील भातपीक पाण्याखाली; शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 00:44 IST

बुडालेल्या भातपिकांचा चिखल, वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.

मधुकर ठाकूर उरण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उरण परिसरातील शेकडो एकर भातपिके पाण्याखाली गेली आहेत. हाती येण्याच्या तयारीत असलेल्या भातपिकाचा अवकाळी पावसामुळे चिखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

यंदा आवश्यकतेनुसार पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला चांगलेच फळ येऊन भातपीक चांगलेच फोफावले होते. तयार झालेले भातपीक हाती येण्याच्या तयारीत असतानाच निसर्गाच्या कोपाने डाव साधला. मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार वादळी पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात कापणीसाठी तयार असलेली भातपिके आकंठ बुडाली आहेत. काही ठिकाणी तर भातपिकांचा चिखल झाला आहे. उरण परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रातील भातशेतीच पाण्यात गेली आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.

नवी मुंबई शहरात ९० मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई शहरात गेल्या तीन दिवसांपासून संध्याकाळी पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. नवी मुंबई शहरात मागील चोवीस तासांत सुमारे ९०.७४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, दररोज काही काळ कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांवर पाणी साचत आहे. गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी बेलापूर विभागात १४३.०६ मिमी, नेरूळ ११८.५० मिमी, वाशी विभागात ८८.६० मिमी, कोपरखैरणे ९२.३० मिमी तर ऐरोली विभागात ४०.०० मिमी पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी