शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

‘त्या’ पाच शेतकºयांना समर्थन : टाटा प्रकल्पाला विरोध; चारशे शेतकºयांनी नोंदवले म्हणणे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 07:00 IST

शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अलिबाग : शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पाच शेतकºयांव्यतिरिक्त अन्यही शेतकºयांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी न्यायाधीश तथा रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांच्यासमोर पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात मंगळवारपासून सुरु झालेल्या सुनावणीअंतर्गत बुधवारअखेर शहापूर व धेरंड गावांतील एकूण ९८० शेतकºयांपैकी ४०१ शेतकºयांनी आपले म्हणणे मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे शेतकरी प्रतिनिधी प्रवीण काशिनाथ भगत (रा.मोठे शहापूर), आत्माराम गोमा पाटील (रा.मोठे शहापूर), विनायक हरिभाऊ पाटील (रा.धाकटे शहापूर),काशिनाथ पुंडलिक पाटील (रा.धेरंड) आणि वसंत शंकर पाटील (रा.धेरंड) या पाच जणांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ आपले म्हणणे नोंदविले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.या पाच शेतकºयांनी सर्व शेतकºयांचे प्रतिनिधी शेतकरी म्हणून २०१२ मध्ये अ‍ॅड.कोलिन गोन्सालवीस आणि अ‍ॅड.गायत्री सिंग यांच्या माध्यमातून, ‘एमआयडीसी’ने केलेल्या या भूसंपादनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांच्या क्षेत्रावर टाटा-रिलायन्सचे औष्णिक वीज प्रकल्पासाठी तेथील शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. याचिका दाखल केलेल्या पाच शेतकºयांची केवळ तीन एकर शेतजमीन आहे. उर्वरित २ हजार ५०० शेतकºयांची १२०० एकर जमीन कंपनीने आधीच विकत घेतली असल्याने या पाच शेतकºयांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यासाठी एमआयडीसीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास विनंती केली होती. मात्र शेतकºयांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात लढणाºया अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी या प्रकरणात नक्की किती शेतकरी होरपळले आहेत याची चौकशी करावी. तसेच ज्या शेतकºयांच्या जमिनी घेतल्या असे सांगण्यात येत आहे, त्या शेतकºयांनी जमिनीच्या किमतीचे पैसे घेतलेले नाहीत अशी वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयात नमूद केली होती. अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी मांडलेली भूमिका मान्य करुन सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी नियुक्त करुन उर्वरित शेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्याचा हा निर्णय घेतला.५८९ शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी गावांत दवंडीमंगळवारपासून सुरु झालेल्या या सुनावणीत दोन दिवसांत एकूण ९८० शेतकºयांपैकी ४०१ शेतकºयांनी येवून आपले म्हणणे मांडले आहे.सुनावणीचा उद्याचा अखेरचा दिवस असल्याने उर्वरित ५८९ शेतकºयांपर्यंत या सुनावणीची माहिती पोहोचवण्याकरिता बुधवारी संध्याकाळपासून श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी शहापूर धेरंड गावांसह परिसरातील वाड्या-पाड्यात जावून दवंडी पिटण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे सुनील नाईक यांनी सांगितले.दरम्यान गेले दोन दिवस आपले म्हणणे मांडण्याकरिता येणाºया शेतकºयांना आवश्यक ते मार्गदर्शन सुनील नाईक, नंदकुमार पाटील, राजन भगत, बाळा पाटील, आत्माराम पाटील आदि कार्यकर्ते करीत आहेत.सर्वोच्च न्यायालय प्रतिनिधी न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरु असून शेतकरी समाधानी आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड