शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

भूस्खलनाच्या ‘त्या’ काळ्या स्मृती

By admin | Updated: July 25, 2015 03:57 IST

निसर्र्ग कोपल्यानंतर काय अनर्थ होतो याचे वास्तव २५ जुलै २००५ रोजी रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर तालुक्यांत आलेल्या महापुरासोबतच्या

जयंत धुळप, अलिबागनिसर्र्ग कोपल्यानंतर काय अनर्थ होतो याचे वास्तव २५ जुलै २००५ रोजी रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर तालुक्यांत आलेल्या महापुरासोबतच्या भूस्खलनाच्या निसर्गापत्तीच्या निमित्ताने कोकणवासीयांना अनुभवास आले, त्या निसर्गापत्तीस यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अतिवृष्टी झाली, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, गावात पुराचे पाणी भरू लागले, जनजीवनच ठप्प झाले, कोकण रेल्वेमार्गही अनेक ठिकाणी वाहून गेला, महामार्ग बंद झाले, अनेक घरांबरोबरच पोलादपूरचं सुंदरराव मोरे कॉलेज वाहून समूळ नष्ट झाले. अतिवृष्टीमुळे डोंगरांच्या महाकाय दरडी महाड तालुक्यात जुई, कोंडिवते, रोहण, दासगाव गावांवर कोसळल्या. यात २४० जणांचा मृत्यू झाला. याच डोंगररांगांतील पोलादपूरमधील तुटवली डोंगरावरील २५० ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आणि तिरका झालेला तुटवलीचा डोंगर दुसऱ्या दिवशी अखेर कोसळला, पण सर्व ग्रामस्थ बचावले. दरडी कोसळण्यास अतिवृष्टीच कारणीभूत असल्याचा दावा सरकारी यंत्रणा तेव्हा करीत असली तरी त्यामागे भूकंप हे एक महत्त्वाचे कारण असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.